शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप महिला, मुले, क्रिकेटपटूंची हत्या; भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:55 IST

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या देशाचा समाचार घेतला. 

अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारतानेअफगाणिस्तानातील तालिबान सरकारसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले पाहिजे. तालिबान फक्त शिक्षा देण्याचीच भूमिका घेतली गेली, तर अफगाणिस्तानमध्ये काहीही बदलणार नाही, असे भारताने म्हटले आहे. 

१० डिसेंबर रोजी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथनेनी हरीश यांनी भूमिका मांडली. 

भारताचे प्रतिनिधी म्हणाले...

अफगाणिस्तानातील लोकांच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे हरीश म्हणाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने निषेध केला. या हल्ल्यात निष्पाण महिला, मुले आणि क्रिकेटपटूंची हत्या केली गेली, ही चिंतेचीच बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. 

पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने म्हटले की, अफगाणिस्तानसोबतचा व्यापार आणि सीमा पूर्णपणे करणे चुकीचे आहे. 

पार्वथनेनी हरीश म्हणाले, 'आम्ही व्यापार आणि स्थलांतरित दहशतवादावरही आम्ही गंभीरपणे पाहत आहोत. यामुळे अफगाणिस्तानातील लोकांना त्यांच्या शेजारी असलेल्या देशात जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेथील लोक अनेक वर्षांपासून कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. हे काम जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे.'

'अफगाणिस्तान एक नाजूक आणि कमकुवत स्थितीत असलेला देश आहे जो सध्या कठीण परिस्थितीतून पुन्हा उभा राहण्याचे प्रयत्न करत आहे. त्याला उघडपणे युद्धाच्या धमक्या आणि कारवाई यूएन चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे', असे हरीश यांनी म्हटले आहे. 

"आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष दिले पाहिजे की, युएन सुरक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आणि दहशतवादी आता सीमेपलिकडच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणार नाही", असेही ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Slams Pakistan at UN Over Afghanistan Attacks, Civilian Deaths

Web Summary : India strongly condemned Pakistan's Afghanistan attacks at the UN, highlighting civilian casualties. India urged diplomatic engagement with the Taliban, emphasizing development. Trade restrictions impacting Afghan people were also criticized, citing international law violations and terrorism concerns.
टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवाद