शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

Video : लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:11 IST

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केला.ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये वाद झाला.

लंडन - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आयएसआयच्या समर्थक असलेल्या काही लोकांनी शनिवारी (9 मार्च) भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या मूळचे भारतीय असलेल्या लोकांवर हल्ला केला. काश्मिरी आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचे लोक भारताविरोधी घोषणाबाजी करत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. परंतु, चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये वाद झाला.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. तब्बल 48 वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. 48 वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 1971 साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLondonलंडन