शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:12 IST

खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा हवाई प्रवाशांना धमकी दिली आहे.

Gurpatwant Singh Pannu:भारताच्या एका माजी अधिकाऱ्याने खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विकास यादव याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने हवाई प्रवाशांना पुन्हा धमकी दिली आहे. पन्नू याने शीख हत्याकांडाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत असतानाच पन्नू याने हा इशारा दिला आहे. त्यामुळे यामध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारताला जाणारी विमाने उडवून देण्याची धमकी दिली आहे. पन्नू याने एका व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाने उड्डाण करु नका असे सांगितले आहे. शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण होत असताना एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असे पन्नूने म्हटलं आहे. पन्नूने हा इशारा अशा वेळी दिला आहे जेव्हा विमान वाहतूक सतत बॉम्बच्या अफवांना तोंड देत आहे. रविवारीही या धमक्यांमुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली होती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शीख फॉर जस्टिसचे प्रमुख पन्नूने प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीही पन्नूने अशीच धमकी दिली होती. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने पन्नूला देशद्रोह आणि फुटीरतावादाच्या आरोपाखाली दहशतवादी घोषित केले आहे. पन्नूने नोव्हेंबर २०२३ मध्ये एका व्हिडिओमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलले जाईल आणि ते १९ नोव्हेंबरला बंद राहील, असं म्हटलं होतं. त्या व्हिडिओमध्ये त्याने त्या दिवशी लोकांना एअर इंडियाने उड्डाण करण्यास मनाई केली होती.

भारतीय विमान कंपन्यांना वारंवार धमक्या 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना धमक्या येत आहेत. एअर इंडिया व्यतिरिक्त आकासा एअर, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. डीजीसीए या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. दुसरीकडे, शनिवारी वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndiaभारतterroristदहशतवादी