शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:12 IST

खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा हवाई प्रवाशांना धमकी दिली आहे.

Gurpatwant Singh Pannu:भारताच्या एका माजी अधिकाऱ्याने खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विकास यादव याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने हवाई प्रवाशांना पुन्हा धमकी दिली आहे. पन्नू याने शीख हत्याकांडाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत असतानाच पन्नू याने हा इशारा दिला आहे. त्यामुळे यामध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारताला जाणारी विमाने उडवून देण्याची धमकी दिली आहे. पन्नू याने एका व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाने उड्डाण करु नका असे सांगितले आहे. शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण होत असताना एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असे पन्नूने म्हटलं आहे. पन्नूने हा इशारा अशा वेळी दिला आहे जेव्हा विमान वाहतूक सतत बॉम्बच्या अफवांना तोंड देत आहे. रविवारीही या धमक्यांमुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली होती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शीख फॉर जस्टिसचे प्रमुख पन्नूने प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीही पन्नूने अशीच धमकी दिली होती. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने पन्नूला देशद्रोह आणि फुटीरतावादाच्या आरोपाखाली दहशतवादी घोषित केले आहे. पन्नूने नोव्हेंबर २०२३ मध्ये एका व्हिडिओमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलले जाईल आणि ते १९ नोव्हेंबरला बंद राहील, असं म्हटलं होतं. त्या व्हिडिओमध्ये त्याने त्या दिवशी लोकांना एअर इंडियाने उड्डाण करण्यास मनाई केली होती.

भारतीय विमान कंपन्यांना वारंवार धमक्या 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना धमक्या येत आहेत. एअर इंडिया व्यतिरिक्त आकासा एअर, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. डीजीसीए या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. दुसरीकडे, शनिवारी वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndiaभारतterroristदहशतवादी