शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:29 IST

जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं.

ठळक मुद्देसीमेवर पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेतकाश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहेपाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतानेपाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्हर्चुअल बैठकीत भारताने पाकिस्तावर दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप केला. त्याचसोबत ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. भारताचं नेतृत्व करणारे परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत पाकिस्तानला विविध मुद्द्यावरुन घेरलं.

या बैठकीत महावीर सिंघवी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं. मुंबई, पठानकोट, उरी, पुलवामा याठिकाणी दहशतवादी हल्ले करणारा देश आता जगाला उपदेशाचे डोस पाजत आहे हे दुर्दैवी आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे. ज्यात त्यांच्या देशात ४० हजाराहून जास्त दहशतवादी असल्याची कबुली दिली आहे असं ते म्हणाले.

तसेच काऊंटर टेररिज्ममध्ये सिंघवी यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि राहील अशा शब्दात पाकला सुनावलं आहे. याठिकाणी पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेत. जे पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच वास्तव सीमेवरील दहशतवाद आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेला दहशतवाद असतानाही काश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहे. भारताने नेहमीच वारंवार सांगितलंही आहे.

याशिवाय भारतासह संपूर्ण जगात मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका आणि योग्य पाऊलं उचलली जात आहेत. मात्र आजही पाकिस्ताने दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात ठेवलं आहे असा घणाघात परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत केला.   

दरम्यान, पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता असा अजब दावा केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद