शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:29 IST

जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं.

ठळक मुद्देसीमेवर पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेतकाश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहेपाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतानेपाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्हर्चुअल बैठकीत भारताने पाकिस्तावर दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप केला. त्याचसोबत ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. भारताचं नेतृत्व करणारे परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत पाकिस्तानला विविध मुद्द्यावरुन घेरलं.

या बैठकीत महावीर सिंघवी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं. मुंबई, पठानकोट, उरी, पुलवामा याठिकाणी दहशतवादी हल्ले करणारा देश आता जगाला उपदेशाचे डोस पाजत आहे हे दुर्दैवी आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे. ज्यात त्यांच्या देशात ४० हजाराहून जास्त दहशतवादी असल्याची कबुली दिली आहे असं ते म्हणाले.

तसेच काऊंटर टेररिज्ममध्ये सिंघवी यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि राहील अशा शब्दात पाकला सुनावलं आहे. याठिकाणी पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेत. जे पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच वास्तव सीमेवरील दहशतवाद आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेला दहशतवाद असतानाही काश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहे. भारताने नेहमीच वारंवार सांगितलंही आहे.

याशिवाय भारतासह संपूर्ण जगात मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका आणि योग्य पाऊलं उचलली जात आहेत. मात्र आजही पाकिस्ताने दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात ठेवलं आहे असा घणाघात परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत केला.   

दरम्यान, पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता असा अजब दावा केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद