शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:29 IST

जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं.

ठळक मुद्देसीमेवर पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेतकाश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहेपाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतानेपाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्हर्चुअल बैठकीत भारताने पाकिस्तावर दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप केला. त्याचसोबत ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. भारताचं नेतृत्व करणारे परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत पाकिस्तानला विविध मुद्द्यावरुन घेरलं.

या बैठकीत महावीर सिंघवी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं. मुंबई, पठानकोट, उरी, पुलवामा याठिकाणी दहशतवादी हल्ले करणारा देश आता जगाला उपदेशाचे डोस पाजत आहे हे दुर्दैवी आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे. ज्यात त्यांच्या देशात ४० हजाराहून जास्त दहशतवादी असल्याची कबुली दिली आहे असं ते म्हणाले.

तसेच काऊंटर टेररिज्ममध्ये सिंघवी यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि राहील अशा शब्दात पाकला सुनावलं आहे. याठिकाणी पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेत. जे पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच वास्तव सीमेवरील दहशतवाद आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेला दहशतवाद असतानाही काश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहे. भारताने नेहमीच वारंवार सांगितलंही आहे.

याशिवाय भारतासह संपूर्ण जगात मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका आणि योग्य पाऊलं उचलली जात आहेत. मात्र आजही पाकिस्ताने दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात ठेवलं आहे असा घणाघात परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत केला.   

दरम्यान, पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता असा अजब दावा केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद