शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 11:54 IST

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मदबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी सरकारच्या सांगण्यावरूनच मसूद अझहर याने भारतात बाँबस्फोट घडवून आणले होते असा गौप्यस्फोट केल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. 

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

मुशर्रफ म्हणाले की, मी आधीपासूनच जैशला दहशतवाद्यांची संघटना म्हणत होतो. त्यांनी माझ्यावर दहशतवादी हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार या संघटनेविरोधात कारवाई करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे म्हचले आहे. ही कारवाई याआधीच व्हायला हवी होती. डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानचमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ते बालंबाल बचावले होते. तेव्हा त्यांनी जैशवर बंदी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. यावर मुशर्रफ यांनी तेव्हा काळ वेगळा होता. यामध्ये आमच्या आयएसआयचा हात होता. तेव्हा भारतासोबत जशास-तसेची भुमिका राबविली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवायचे म्हणून आम्ही भारतात स्फोट करायचो, असेही सांगितले. 

 

गच्छंतीनंतर मुशर्रफ यांचे पाकिस्तानबाहेर पलायनमुशर्रफ यांनी लष्करशाहीचा वापर करत 1999 मध्ये पाकिस्तानचा ताबा मिळविला होता. तेव्हा नवाझ शरीफ यांना हटविण्यात आले होते व राष्ट्रपती बनले होते. मात्र, त्यांना नऊ वर्षांनी सत्ता गमवावी लागली होती. यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकला अखेर हे पाऊल उचलावे लागले.

यासंदर्भात पाकचे गृहमंत्री शहरयार खान आफ्रिदी म्हणाले की, दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकचे गृह सचिव आझम सुलेमान खान म्हणाले, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या ज्या दहशतवाद्यांची नावे भारताने गेल्या आठवड्यात कळविली होती त्यात हम्माद व रौफ यांचीही नावे होती. भारताने ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला होता, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली असा अर्थ कोणीही काढू नये. त्या व्यतिरिक्तही अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndiaभारत