शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

'हे केवळ अयोध्येवरच थांबणार नाही, आता ज्ञानवापी अन्...'; पाकिस्तानचा थयथयाट, UN कडे केली रडारड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:42 PM

मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून लिहिलंय पत्र...

अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासूनच पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. यातच आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (यूएन) धाव घेतली आहे आणि भारतातील इस्लामिक स्थळांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अकरम यांनी बुधवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या एका बैठकीदरम्यान ही मांगणी केली आहे. ही बैठक ओआयसीच्या सदस्य देशांची होती.

यापूर्वी अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याचा निषेध केला होता. आपल्या निवेदनात पाकिस्तानने म्हटले होते की, 6 डिसेंबर 1992 रोजी जमावाने शतकानुशतके उभी असलेली मशीद पाडली. भारतातील सर्वाच्च न्यायालयाने या घटनेला जबाबदार असलेल्यांना निर्दोष मुक्त केले. एवढेच नाही तर त्याच ठिकाणी राम मंदिर उभारणीलाही मंजुरी देण्यात आली.  हे निंदनीय आहे.

पाकिस्तानने UN कडे केली अशी मागणी - पाकिस्तानची न्यूज वेबसाइट 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे की, "भारतातील अयोध्येमध्ये पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो. हा ट्रेंड भारतीय मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणाबरोबरच, प्रदेशातील सौहार्द आणि शांततेलाही गंभीर धोका निर्माण करतो."

UN ला लिहिलेल्या पत्रात मुनीर अकरम यांनी म्हटले आहे की, भारतातील मुस्लीम धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आपण तात्काळ हस्तक्षेप करावा, यासाटी मी हे पत्र लिहित आहे. संयुक्त राष्ट्रांने इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडायला हवी.

ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशिदीसंदर्भातरही व्यक्त केली चिंता -मुनीर अकरम यांनी पुढे म्हटले आहे, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा, भारतातील मशिदी नष्ट करण्याचा प्रयत्न आणि धार्मिक भेदभाव दर्शवतात. प्रकरण बाबरी मशिदीच्याही पलीकडे गेले आहे. भारतातील इतर मशिदींनाही अशाच प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. दुर्दैवाने, ही एकच घटना नाही. कारण वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही इदगाह मशिदीसह इतर मशिदींनाही, अशा धोक्याचा सामना करावा लागू शकतो."

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ