शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:54 IST

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच

न्यूयॉर्क : काश्मीरमध्ये भारताने चालविलेले अत्याचार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय दबाव आणताना दिसत नाही. ही स्थिती पाहून आपण निराश झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या येथे आयोजिण्यात आलेल्या आमसभेला उपस्थित राहाण्यासाठी इम्रान खान आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून तिथे संचारबंदी व अन्य निर्बंध लागू करण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला यांच्यासह काही महत्त्वाचे नेते व फुटीरतावादी नेते, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.भारत काश्मिरी जनतेच्या हक्कांची गळचेपी करीत असल्याच्या पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने अजिबात महत्त्व दिले नाही. तरीही पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. ऐंशी लाखांपेक्षा जास्त ज्यू किंवा अगदी आठ अमेरिकी लोकांना जर कोंडून ठेवले असते, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरबाबत घेतली आहे, तशीच भूमिका त्यावेळी घेतली असती का, असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील निर्बंध हटवावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणलेला नाही. असे असले तरी काश्मीरमधील परिस्थितीचा मुद्दा पाकिस्तान यापुढेही मांडतच राहाणार. काश्मीरमध्ये ९० हजार सैनिक तैनात करण्याचे कारणच काय? संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आली की, काश्मीरमध्ये नेमके काय होणार आहे, हे देवालाच ठाऊक, असेही इम्रान खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)काश्मिरी निमूटपणे निर्णय मान्य करतील?काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय तेथील लोक निमूटपणे मान्य करतील, असे वाटते काय, असे चिथावणीखोर उद्गारदेखील इम्रान यांनी काढले आहेत.ते म्हणाले की, भारताची मोठी बाजारपेठ व आर्थिक क्षमता यांच्याकडे पाहून जगातील अनेक देश काश्मीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.काश्मीरबाबत पाकिस्तान करीत असलेल्या वक्तव्यांना आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्व देत नाही, अशी खंतही इम्रान खान यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370