शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:54 IST

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच

न्यूयॉर्क : काश्मीरमध्ये भारताने चालविलेले अत्याचार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय दबाव आणताना दिसत नाही. ही स्थिती पाहून आपण निराश झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या येथे आयोजिण्यात आलेल्या आमसभेला उपस्थित राहाण्यासाठी इम्रान खान आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून तिथे संचारबंदी व अन्य निर्बंध लागू करण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला यांच्यासह काही महत्त्वाचे नेते व फुटीरतावादी नेते, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.भारत काश्मिरी जनतेच्या हक्कांची गळचेपी करीत असल्याच्या पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने अजिबात महत्त्व दिले नाही. तरीही पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. ऐंशी लाखांपेक्षा जास्त ज्यू किंवा अगदी आठ अमेरिकी लोकांना जर कोंडून ठेवले असते, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरबाबत घेतली आहे, तशीच भूमिका त्यावेळी घेतली असती का, असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील निर्बंध हटवावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणलेला नाही. असे असले तरी काश्मीरमधील परिस्थितीचा मुद्दा पाकिस्तान यापुढेही मांडतच राहाणार. काश्मीरमध्ये ९० हजार सैनिक तैनात करण्याचे कारणच काय? संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आली की, काश्मीरमध्ये नेमके काय होणार आहे, हे देवालाच ठाऊक, असेही इम्रान खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)काश्मिरी निमूटपणे निर्णय मान्य करतील?काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय तेथील लोक निमूटपणे मान्य करतील, असे वाटते काय, असे चिथावणीखोर उद्गारदेखील इम्रान यांनी काढले आहेत.ते म्हणाले की, भारताची मोठी बाजारपेठ व आर्थिक क्षमता यांच्याकडे पाहून जगातील अनेक देश काश्मीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.काश्मीरबाबत पाकिस्तान करीत असलेल्या वक्तव्यांना आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्व देत नाही, अशी खंतही इम्रान खान यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370