शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सत्ताधारी निवडणुकीमुळे युद्धाला आतुर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:21 IST

पाकच्या मंत्र्याचा कांगावा : स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तराचा आम्हाला हक्क

इस्लामाबाद : भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून ‘आक्रमण’ केले आहे आणि त्याला उत्तर देण्याचा पाकिस्तानला हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बाजूकडील नियंत्रण रेषा मंगळवारी पहाटे ओलांडून भारतीय हवाई दलाने अनेक ठिकाणचे दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट केल्यानंतर कुरेशी यांनी वरील भाष्य केले.

भारताच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान इम्रान खान होते. कुरेशी म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर आज आक्रमण केले आहे.

या बैठकीची थोडक्यात माहिती परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी नंतर पंतप्रधान इम्रान खान यांना दिली. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या लष्कराने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचे भारतीय हवाई दलाने उल्लंघन केल्याचा आरोप केला. भारतीय विमानाने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्याला पाकिस्तानच्या हवाई दलाने योग्य वेळी व परिणामकारक उत्तर दिले. त्यावेळी तेथून पळून जाताना त्याने घाईघाईत बालाकोटजवळ बॉम्ब टाकला. कोणतीही जीवितहानी झाली नाही की नुकसान, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक व मेजर जनरल असिफ गफूर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने ताबडतोब कारवाई करताच भारतीय विमान परत गेले, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)सिनेटर व पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या नेत्या शेरी रहमान म्हणाल्या की, नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेले आक्रमण हे व्यूहरचनेच्या दृष्टीने चुकीचे आणि डावपेचाच्या संदर्भात निरर्थक आहे. अशा चाली या फक्त संताप निर्माण झालेल्या विभागात तणाव निर्माण करतात. हे उघडच आहे की भारतातील सत्ताधारी पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा काही मार्ग दिसत नसल्यामुळे तो युद्धाला आतुर झाला आहे, असे रहमान यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारत सरकारने देशांतर्गतच्या दबावामुळे लाक्षणिक घुसखोरी केली आहे, असे म्हटले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक