शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

भारतातील सत्ताधारी निवडणुकीमुळे युद्धाला आतुर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 5:21 AM

पाकच्या मंत्र्याचा कांगावा : स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तराचा आम्हाला हक्क

इस्लामाबाद : भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून ‘आक्रमण’ केले आहे आणि त्याला उत्तर देण्याचा पाकिस्तानला हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बाजूकडील नियंत्रण रेषा मंगळवारी पहाटे ओलांडून भारतीय हवाई दलाने अनेक ठिकाणचे दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट केल्यानंतर कुरेशी यांनी वरील भाष्य केले.

भारताच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान इम्रान खान होते. कुरेशी म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर आज आक्रमण केले आहे.

या बैठकीची थोडक्यात माहिती परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी नंतर पंतप्रधान इम्रान खान यांना दिली. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या लष्कराने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचे भारतीय हवाई दलाने उल्लंघन केल्याचा आरोप केला. भारतीय विमानाने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्याला पाकिस्तानच्या हवाई दलाने योग्य वेळी व परिणामकारक उत्तर दिले. त्यावेळी तेथून पळून जाताना त्याने घाईघाईत बालाकोटजवळ बॉम्ब टाकला. कोणतीही जीवितहानी झाली नाही की नुकसान, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक व मेजर जनरल असिफ गफूर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने ताबडतोब कारवाई करताच भारतीय विमान परत गेले, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)सिनेटर व पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या नेत्या शेरी रहमान म्हणाल्या की, नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेले आक्रमण हे व्यूहरचनेच्या दृष्टीने चुकीचे आणि डावपेचाच्या संदर्भात निरर्थक आहे. अशा चाली या फक्त संताप निर्माण झालेल्या विभागात तणाव निर्माण करतात. हे उघडच आहे की भारतातील सत्ताधारी पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा काही मार्ग दिसत नसल्यामुळे तो युद्धाला आतुर झाला आहे, असे रहमान यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारत सरकारने देशांतर्गतच्या दबावामुळे लाक्षणिक घुसखोरी केली आहे, असे म्हटले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक