शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

Indian Missile: 'वेग इतका जास्त होता की...' पाकिस्तान भारताचे क्षेपणास्त्र का पाडू शकला नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 13:28 IST

Indian Missile: भारताकडून एक सुपरसॉनिक मिसाईल आपल्या हद्दीत कोसळल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला होता. भारतानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आल्याचे म्हटले.

नवी दिल्ली:भारताकडून एक सुपरसॉनिक मिसाईल आपल्या हद्दीत कोसळल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला होता. पाकिस्तानने म्हटले की, भारताकडून आलेल्या मिसाईलने त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि अनेक इमारतींचे नुकसान केले. दरम्यान, भारतानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आल्याचे म्हटले. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, भारतातून एक मिसाईल पाकिस्तानात गेली, पण पाकिस्तानचे हवाई दल त्या मिसाईलवर हल्ला का करू शकले नाही? 

भारताने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा पाकचा आरोपपाकिस्तानच्या लष्कराने दावा केला की, क्षेपणास्त्राने भारतातील सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे त्यांना माहित होते आणि काही वेळातच क्षेपणास्त्राने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत स्वतःहून कोसळले.

पाकिस्तानी हवाई दल भारतीय क्षेपणास्त्र का पाडू शकले नाही?नवी दिल्लीतील सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज (CAPS) थिंक टँकचे प्रमुख सेवानिवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी म्हटले की, हे क्षेपणास्त्र ज्या वेगाने पाकिस्तानच्या हद्दीत गेले, त्या वेगाने क्षेपणास्त्र मारण्यासाठी पाकिस्तानला फारसा वेळ मिळाला नाही. इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले की, 'जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असेल, तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे तुमच्यासाठी सोपे नसते. त्या मार्गावर क्षेपणास्त्र आहे हेही तुम्हाला माहीत नसते. पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या कोणताही तणाव नसून दोन्ही देशांसाठी हा शांततेचा काळ आहे. ही रेड अलर्ट स्थिती नाही, त्यामुळे पाकिस्तानला क्षेपणास्त्र ओळखून ते पाडता आले नाही. असे असले तरी, जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असते, तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत.'

क्षेपणास्त्र चाचणीबाबत दोन्ही देशांमधील नियम2005 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीबाबत करार झाला होता. करारानुसार, प्रत्येक देशाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीच्या किमान तीन दिवस आधी सूचित करावे लागेल. हा करार सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी लागू आहे मग ते पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र असो किंवा पृष्ठभागावरून समुद्रात मारा करणारे क्षेपणास्त्र असो. करारानुसार, क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण, म्हणजेच ज्या ठिकाणाहून क्षेपणास्त्र सोडले जाणार आहे, ते ठिकाण दोन्ही देशांच्या सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असले पाहिजे. क्षेपणास्त्र नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून 75 किमी अंतरावर सोडले पाहिजे. मात्र, अशी कोणतीही माहिती भारताकडून देण्यात आली नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

इम्रान खान काय म्हणाले?या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही प्रतिक्रिया दिली. रविवारी पंजाबच्या हाफिजाबाद जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, "आम्ही पाकिस्तानमध्ये भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, परंतु आम्ही संयम बाळगला." दरम्यान, भारताने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यावर पाकिस्तानने म्हटले की, भारताच्या बाजूने तपास पुरेसा नाही आणि दोन्ही देशांची संयुक्त चौकशी झाली पाहिजे. 

संयुक्त चौकशीची मागणीभारताच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, क्षेपणास्त्र दुर्घटनेवर भारताच्या प्रतिसादावर ते समाधानी नाहीत. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संयुक्त तपासाची मागणी पाकिस्तानने केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतDefenceसंरक्षण विभागImran Khanइम्रान खान