शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 10:21 IST

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता.

भारत आणि कॅनडादरम्यान दहशतवाद्यांवरून सुरु झालेला राजकीय वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीय. कॅनडा वेळोवेळी भारताला लक्ष्य करत सुटला आहे. आता कॅनडाच्या फॉरेन इंटरफेयरन्स कमिशनने भारतावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भारताने म्हणे तिथल्या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलाचा आरोप या कमिशनने लावला आहे. याची चौकशीही या कमिशनने लावली आहे. 

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. यासाठी या कमिशनची स्थापना केली होती. तिथे भागले नाही म्हणून आता भारतावर नसते आरोप करत सुटला आहे. यामुळे या कमिशनने गेल्या सप्टेंबरमध्ये चौकशी सुरु केली होती. आता भारत सरकारकडे कथितरित्या हस्तक्षेप संबंधीची कागदपत्रे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. 

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. शीख दहशतवादी निज्जरची हत्या झाली होती, ती भारताने केल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता. तर भारताने याचे पुरावे मागितले होते. आता वर्ष होत आले तरी कॅनडा काही पुरावे देऊ शकली नाही. या वादात भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. हे लोक भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत होते. 

आता हा कॅनडाचा आयोग 3 मे 2024 पर्यंत अंतरिम अहवाल पूर्ण करणार आहे. बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आयोग 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम अहवाल सादर करेल. हा आयोग रशिया आणि इराणच्या कथित सहभागाची चौकशी करत आहे.

निवडणुकांमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील लिबरल्सची पुन्हा निवड झाली आहे. चीनवर परंपरावाद्यांच्या विरोधात उदारमतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव टाकण्यात भारताच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी ट्रुडो यांना लिहिले होते. 

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडो