शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:19 IST

मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला.

देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बाहेरच्या देशात असलेल्या भारतीयांनीहीस्वातंत्र्य दिन साजरा केला. तर दुसरीकडे खलिस्तान्यांना आपला स्वातंत्र्य दिन रुचलेला नाही.  आधी कॅनडात गोंधळ घातला. आता ऑस्ट्रेलियातूनही खलिस्तान समर्थकांकडून भारतीयांना त्रास दिल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. ही घटना  मेलबर्नमधील आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान बराच गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी मेलबर्नमध्ये एका हिंदू मंदिराचे नुकसान झाल्याची घटना समोर आली होती.

'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी परिसरात गोंधळ घातला. परिस्थिती इतकी बिकट झाली. पोलिसांना येऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

आधी मंदिरांवर घोषणा लिहिल्या

काही दिवसापूर्वी मेलबर्नमधील एका हिंदू मंदिराच्या भिंतींवर द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या. हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया चॅप्टरचे प्रमुख मकरंद भागवत यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, 'आपली मंदिरे शांती, भक्ती, पवित्रता आणि एकतेची ठिकाणे आहेत. ही तोडफोड म्हणजे धर्म स्वातंत्र्यावर हल्ला आहे.'

आयर्लंडमध्येही भारतीयांवर हल्ला

गेल्या काही आठवड्यात आयर्लंडमध्ये भारतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅनडामध्ये एका भारतीय जोडप्याच्या छळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला खूप गांभीर्याने घेतो.

टॅग्स :IndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिन