शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:41 IST

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे.

तुमच्याकडे फारसं शिक्षण नाहीए, तुमच्याकडे कोणतंही विशेष स्किल नाहीए, परिस्थिती फारशी चांगली नाहीए, वाडवडिलांनी काही कमवून ठेवलेलं नाहीए, जे काही करायचं असेल ते सारं स्वत:च्या हिकमतीवर करायचं आहे, गरिबीतून आणि कर्जाच्या डोंगरातून कुटुंबाला बाहेर काढायचं आहे, ‘श्रीमंत’ व्हायचं आहे, तर काय करायचं?- थोड्या कालावधीत चांगला पैसा कमवायचा असेल तर अनेक भारतीय आखाती देशात जातात. काही वर्षं तिथे राहातात, बक्कळ पैसा कमावतात, स्वत: तिथे ओढग्रस्तीत राहातात; पण तिथे मिळेल ते काम करून भरपूर पैसे भारतात आपल्या घरी, कुटुंबीयांकडे पाठवतात.

विशेषत: गरीब, निम्न मध्यमवर्गीय अशा लोकांनी आखाती देशांत जाऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती खरोखरच पालटवली आहे. अशी एक नाही, दोन नाही, हजारो भारतीय कुटुंबं भारतात आहेत. अगदी मजुरीचं का काम होईना; पण त्याच कामाचा भारतात मिळणारा मोबदला आणि आखाती देशांत मिळणारा मोबदला पाहिला तर त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळेच एखाद्या घरातला कोणी कामासाठी म्हणून आखाती देशांत गेला की लवकरच तो आपल्या भावाला, मुलांना तिथे बोलावून घेतो आणि हे सारे मिळून मग आपल्या कुटुंबाची परिस्थितीच बदलून टाकतात.

एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा.. असे अनेक जण मग आखाती देशात स्थायिक होतात. व्हिसा, विमान प्रवासाची तिकिटं, यासाठी बऱ्याचदा ते आपल्या किमती वस्तू, घरंदारं गहाण ठेवूनही पैशाची व्यवस्था करतात. कारण काही महिन्यांत, एखाद-दोन वर्षांतच आपलं सारं कर्ज वगैेरे फेडून आपण सुखवस्तू होऊ याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच भारतातली, विशेषत: उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातील अशी अनेक गावं आहेत, जिथे पुरुषांची संख्या अगदी नावालाच आहे. कारण तिथले बहुसंख्य पुरुष पैसे कमावण्यासाठी आखाती देशांत गेलेले आहेत. 

एकट्या सौदी अरोबियाचाच विचार केला तरी २०२४च्या आकडेवारीनुसार तिथे साधारण २५ लाख भारतीय राहातात. अर्थातच यातले बहुतांश निम्नस्तरीय वर्गांतील आहेत. अशीच अवस्था इतर आखाती देशांतही आहे. पण ही परिस्थिती आता बदलू शकते. भारतातून येणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सौदी अरेबियानं आता आपल्या ‘वर्क व्हिसा’वर निर्बंध आणले आहेत आणि त्यासंदर्भातले नियम संक्रांतीपासून म्हणजे १४ जानेवारी २०२५पासून बरेच कडक केले आहेत. 

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. यासंदर्भात ज्यांची पात्रता कमी असेल, त्यांना वर्क व्हिसातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं कमअस्सल माणसं आमच्याकडे येऊ नयेत असं आमचं धोरण आहे, असं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे यासंदर्भात आता कडक तपासणी करून मगच देशात प्रवेश दिला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहेे. सौदी अरेबियात बांगला देशानंतर सर्वाधिक भारतीय कामगार आहेत. सौदीप्रमाणेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि कुवेत यांसारख्या इतर आखाती देशांतही लाखो भारतीय काम करतात. सौदीनंतर हे देशही आपल्या देशात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती