शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:41 IST

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे.

तुमच्याकडे फारसं शिक्षण नाहीए, तुमच्याकडे कोणतंही विशेष स्किल नाहीए, परिस्थिती फारशी चांगली नाहीए, वाडवडिलांनी काही कमवून ठेवलेलं नाहीए, जे काही करायचं असेल ते सारं स्वत:च्या हिकमतीवर करायचं आहे, गरिबीतून आणि कर्जाच्या डोंगरातून कुटुंबाला बाहेर काढायचं आहे, ‘श्रीमंत’ व्हायचं आहे, तर काय करायचं?- थोड्या कालावधीत चांगला पैसा कमवायचा असेल तर अनेक भारतीय आखाती देशात जातात. काही वर्षं तिथे राहातात, बक्कळ पैसा कमावतात, स्वत: तिथे ओढग्रस्तीत राहातात; पण तिथे मिळेल ते काम करून भरपूर पैसे भारतात आपल्या घरी, कुटुंबीयांकडे पाठवतात.

विशेषत: गरीब, निम्न मध्यमवर्गीय अशा लोकांनी आखाती देशांत जाऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती खरोखरच पालटवली आहे. अशी एक नाही, दोन नाही, हजारो भारतीय कुटुंबं भारतात आहेत. अगदी मजुरीचं का काम होईना; पण त्याच कामाचा भारतात मिळणारा मोबदला आणि आखाती देशांत मिळणारा मोबदला पाहिला तर त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळेच एखाद्या घरातला कोणी कामासाठी म्हणून आखाती देशांत गेला की लवकरच तो आपल्या भावाला, मुलांना तिथे बोलावून घेतो आणि हे सारे मिळून मग आपल्या कुटुंबाची परिस्थितीच बदलून टाकतात.

एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा.. असे अनेक जण मग आखाती देशात स्थायिक होतात. व्हिसा, विमान प्रवासाची तिकिटं, यासाठी बऱ्याचदा ते आपल्या किमती वस्तू, घरंदारं गहाण ठेवूनही पैशाची व्यवस्था करतात. कारण काही महिन्यांत, एखाद-दोन वर्षांतच आपलं सारं कर्ज वगैेरे फेडून आपण सुखवस्तू होऊ याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच भारतातली, विशेषत: उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातील अशी अनेक गावं आहेत, जिथे पुरुषांची संख्या अगदी नावालाच आहे. कारण तिथले बहुसंख्य पुरुष पैसे कमावण्यासाठी आखाती देशांत गेलेले आहेत. 

एकट्या सौदी अरोबियाचाच विचार केला तरी २०२४च्या आकडेवारीनुसार तिथे साधारण २५ लाख भारतीय राहातात. अर्थातच यातले बहुतांश निम्नस्तरीय वर्गांतील आहेत. अशीच अवस्था इतर आखाती देशांतही आहे. पण ही परिस्थिती आता बदलू शकते. भारतातून येणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सौदी अरेबियानं आता आपल्या ‘वर्क व्हिसा’वर निर्बंध आणले आहेत आणि त्यासंदर्भातले नियम संक्रांतीपासून म्हणजे १४ जानेवारी २०२५पासून बरेच कडक केले आहेत. 

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. यासंदर्भात ज्यांची पात्रता कमी असेल, त्यांना वर्क व्हिसातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं कमअस्सल माणसं आमच्याकडे येऊ नयेत असं आमचं धोरण आहे, असं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे यासंदर्भात आता कडक तपासणी करून मगच देशात प्रवेश दिला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहेे. सौदी अरेबियात बांगला देशानंतर सर्वाधिक भारतीय कामगार आहेत. सौदीप्रमाणेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि कुवेत यांसारख्या इतर आखाती देशांतही लाखो भारतीय काम करतात. सौदीनंतर हे देशही आपल्या देशात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती