शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:41 IST

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे.

तुमच्याकडे फारसं शिक्षण नाहीए, तुमच्याकडे कोणतंही विशेष स्किल नाहीए, परिस्थिती फारशी चांगली नाहीए, वाडवडिलांनी काही कमवून ठेवलेलं नाहीए, जे काही करायचं असेल ते सारं स्वत:च्या हिकमतीवर करायचं आहे, गरिबीतून आणि कर्जाच्या डोंगरातून कुटुंबाला बाहेर काढायचं आहे, ‘श्रीमंत’ व्हायचं आहे, तर काय करायचं?- थोड्या कालावधीत चांगला पैसा कमवायचा असेल तर अनेक भारतीय आखाती देशात जातात. काही वर्षं तिथे राहातात, बक्कळ पैसा कमावतात, स्वत: तिथे ओढग्रस्तीत राहातात; पण तिथे मिळेल ते काम करून भरपूर पैसे भारतात आपल्या घरी, कुटुंबीयांकडे पाठवतात.

विशेषत: गरीब, निम्न मध्यमवर्गीय अशा लोकांनी आखाती देशांत जाऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती खरोखरच पालटवली आहे. अशी एक नाही, दोन नाही, हजारो भारतीय कुटुंबं भारतात आहेत. अगदी मजुरीचं का काम होईना; पण त्याच कामाचा भारतात मिळणारा मोबदला आणि आखाती देशांत मिळणारा मोबदला पाहिला तर त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळेच एखाद्या घरातला कोणी कामासाठी म्हणून आखाती देशांत गेला की लवकरच तो आपल्या भावाला, मुलांना तिथे बोलावून घेतो आणि हे सारे मिळून मग आपल्या कुटुंबाची परिस्थितीच बदलून टाकतात.

एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा.. असे अनेक जण मग आखाती देशात स्थायिक होतात. व्हिसा, विमान प्रवासाची तिकिटं, यासाठी बऱ्याचदा ते आपल्या किमती वस्तू, घरंदारं गहाण ठेवूनही पैशाची व्यवस्था करतात. कारण काही महिन्यांत, एखाद-दोन वर्षांतच आपलं सारं कर्ज वगैेरे फेडून आपण सुखवस्तू होऊ याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच भारतातली, विशेषत: उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातील अशी अनेक गावं आहेत, जिथे पुरुषांची संख्या अगदी नावालाच आहे. कारण तिथले बहुसंख्य पुरुष पैसे कमावण्यासाठी आखाती देशांत गेलेले आहेत. 

एकट्या सौदी अरोबियाचाच विचार केला तरी २०२४च्या आकडेवारीनुसार तिथे साधारण २५ लाख भारतीय राहातात. अर्थातच यातले बहुतांश निम्नस्तरीय वर्गांतील आहेत. अशीच अवस्था इतर आखाती देशांतही आहे. पण ही परिस्थिती आता बदलू शकते. भारतातून येणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सौदी अरेबियानं आता आपल्या ‘वर्क व्हिसा’वर निर्बंध आणले आहेत आणि त्यासंदर्भातले नियम संक्रांतीपासून म्हणजे १४ जानेवारी २०२५पासून बरेच कडक केले आहेत. 

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. यासंदर्भात ज्यांची पात्रता कमी असेल, त्यांना वर्क व्हिसातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं कमअस्सल माणसं आमच्याकडे येऊ नयेत असं आमचं धोरण आहे, असं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे यासंदर्भात आता कडक तपासणी करून मगच देशात प्रवेश दिला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहेे. सौदी अरेबियात बांगला देशानंतर सर्वाधिक भारतीय कामगार आहेत. सौदीप्रमाणेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि कुवेत यांसारख्या इतर आखाती देशांतही लाखो भारतीय काम करतात. सौदीनंतर हे देशही आपल्या देशात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती