शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिमविरोधी; इम्रान खान यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 14:30 IST

पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला आसरा देत नसल्याचा कांगावा

इस्लामाबाद : भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपा हा मुस्लिमविरोधी असून माझ्याकडून दिले गेलेले शांतीप्रस्ताव धुडकावून लावल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे. 

जुलैमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्या भाषणात इम्रान खान यांनी भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल, असे सांगितले होते. तसेच नुकत्याच सार्क देशांच्या सम्मेलनाला सहभागी होण्यासाठी इम्रान खान यांनी निमंत्रण दिले होते. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चर्चा आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नसल्याचे सुनावले होते. 

मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालेली भारताला पाहायची असल्याचे असे विचारल्यावर इम्रान यांनी या प्रकरणी सध्याची पाकिस्तानमधील प्रगती काय आहे याची माहीती घेत आहे. ही दहशतवादाशी जोडलेली घटना होती, ती आम्हाला सोडवायची आहे. जेव्हा भारतात निवडणुका होतील त्यावेळीच दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला आसरा देत नाहीय. सुरक्षा दले मला माहिती देत असतात. पाकिस्तानात कुठे-कुठे दहशतवादी गट सक्रीय आहेत, हे अमेरिकेने सांगावेच, असे आव्हानही त्यांनी दिले. अमेरिकेला 1980 मध्ये अफगाणिस्तानमध्ये मदत करून पाकिस्तानचेच नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पाकचे 80 हजार सैनिक-नागरिक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला. एवढे असूनही लादेनला मारताना अमेरिकेचा आमच्यावर विश्वास नव्हता असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानBJPभाजपाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला