पालघर : समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या तुरुंगात दोन वर्षांचा शिक्षा कालावधी पूर्ण करणाऱ्या एका भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला. पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू पावणारा हा दुसरा भारतीय मच्छीमार असून, राज्यातील १९ मच्छीमारांसह एकूण १९९ भारतीय मच्छीमार आजही पाकिस्तानी तुरुंगात मरणयातना भोगत असल्याची माहिती शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी दिली.
पोरबंदर या मासेमारी बंदरांतून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सातपाटी येथील नामदेव मेहेर यांच्यासह ८ मच्छीमारांना पाकिस्तानी मेरीटाईम सिक्युरिटी पोलिसांनी तुरुंगात धाडले आहे. पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले एकूण १९ मच्छीमार हे महाराष्ट्रतील असून, भारतीय मच्छीमारांची एकूण संख्या १९९ आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या राज्यातील १८ मच्छीमारांसह १७५ भारतीय मच्छीमारांची शिक्षा दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाली आहे. असे असतानाही ते आजही तुरुंगात मरणयातना भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबांना ठरलेली मदतदेखील राज्य सरकारकडून वेळेवर दिली जात नाही.
Web Summary : A Maharashtra fisherman died in a Pakistani jail after completing his sentence for inadvertently crossing maritime borders. Nineteen Maharashtra fishermen, among 199 Indians, remain imprisoned in Pakistan, despite many having completed their sentences two years ago. Families struggle with delayed state government assistance.
Web Summary : समुद्री सीमा पार करने पर सजा पूरी होने के बाद एक भारतीय मछुआरे की पाकिस्तानी जेल में मौत हो गई। महाराष्ट्र के उन्नीस मछुआरे, 199 भारतीयों में से हैं, जो पाकिस्तान में कैद हैं, जिनमें से कई की सजा दो साल पहले पूरी हो चुकी है। परिवारों को राज्य सरकार से मिलने वाली सहायता में देरी हो रही है।