शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:20 IST

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे.

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. यात अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबानसमोर उपस्थित केला आहे. भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. (Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal)

अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

    तालिबानच्या अब्बास यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यात तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अफागणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यताची मुद्दा भारतानं चर्चेत उपस्थित केला. भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याची ग्वाही यावेळी तालिबाननं दिल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्यानंही पूर्णपणे माघार घेतली आहे. त्यामुळे काबुल विमानतळावरही आता तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.

    भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

    अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

    अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तालिबाननं सत्ता काबिज केल्यानंतर भारत अफगाणिस्तानबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतात केल्या गेलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत भारत चर्चा करणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण गेल्या काही वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली हजारो कोटींची गुंतवणूक आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूतांनी आज तालिबानसोबत केलेली चर्चा याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानसोबत चर्चेची तयारी ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

    टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत