शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:20 IST

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे.

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. यात अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबानसमोर उपस्थित केला आहे. भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. (Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal)

अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

    तालिबानच्या अब्बास यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यात तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अफागणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यताची मुद्दा भारतानं चर्चेत उपस्थित केला. भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याची ग्वाही यावेळी तालिबाननं दिल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्यानंही पूर्णपणे माघार घेतली आहे. त्यामुळे काबुल विमानतळावरही आता तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.

    भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

    अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

    अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तालिबाननं सत्ता काबिज केल्यानंतर भारत अफगाणिस्तानबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतात केल्या गेलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत भारत चर्चा करणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण गेल्या काही वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली हजारो कोटींची गुंतवणूक आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूतांनी आज तालिबानसोबत केलेली चर्चा याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानसोबत चर्चेची तयारी ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

    टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत