शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:20 IST

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे.

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. यात अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबानसमोर उपस्थित केला आहे. भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. (Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal)

अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

    तालिबानच्या अब्बास यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यात तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अफागणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यताची मुद्दा भारतानं चर्चेत उपस्थित केला. भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याची ग्वाही यावेळी तालिबाननं दिल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्यानंही पूर्णपणे माघार घेतली आहे. त्यामुळे काबुल विमानतळावरही आता तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.

    भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

    अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

    अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तालिबाननं सत्ता काबिज केल्यानंतर भारत अफगाणिस्तानबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतात केल्या गेलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत भारत चर्चा करणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण गेल्या काही वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली हजारो कोटींची गुंतवणूक आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूतांनी आज तालिबानसोबत केलेली चर्चा याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानसोबत चर्चेची तयारी ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

    टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत