शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:23 IST

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता.

जकार्ता - मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान संघर्षात जर पाकने अणुबॉम्बने हल्ला केला असता तर भारताने काय केले असते? याचा खुलासा इंडोनेशियात भारतीय संरक्षण खात्याने केला आहे. जकार्ता येथे तैनात भारतीय दूतावास कार्यालयातील भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार यांनी इंडोनेशियन वायूसेनेसमोर भारताच्या निर्णयाबाबत सांगताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. इंडोनेशिया एअरफोर्स यूनिवर्सिटीत आयोजित २ महत्त्वाचे सेमिनार पार पडले. त्यात भारताने जगाला त्यांचे अणूधोरण स्पष्ट केले. जर पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकला असता तर भारताने नकाशातून पाकिस्तानला मिटवला असता असा इशाराच नौदल कॅप्टन शिव कुमार यांनी दिला.

ऑपरेशन सिंदूरबाबत शिव कुमार म्हणाले की, जर भारतावर पाकिस्तानने अणुहल्ला केला असता तर हे स्पष्ट होते की, पाकिस्तानचं अस्तित्व नष्ट केले असते हे आमचे धोरण होते असा खुलासा त्यांनी इंडोनेशियात केला. शिव कुमार यांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात जे पाकिस्तानी नेते वारंवार भारताला अणुबॉम्बची धमकी देतात त्यांना हा इशारा दिला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळीही भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात आम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्याशिवाय यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधात युद्ध समजले जाईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. 

पाकिस्तानचा मागमूस पुसून टाकला असता...

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता. ज्यात आधुनिक मिसाईल, ड्रोन, एअर डिफेन्स याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. भारतीय हवाई दलाने ज्या अचूकपणे पाकिस्तानात हल्ले केले. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर हल्ले केले या ऑपरेशनची माहिती इंडोनेशिया हवाई दलाला हवी होती. चर्चासत्रादरम्यान, भारताने 'अण्वस्त्र मर्यादे'च्या खाली राहून संतुलित परंतु प्रभावी लष्करी कारवाई केली आणि भारताने युद्ध पूर्णपणे नियंत्रणात ठेवले असं इंडोनेशियन संरक्षण तज्ञांनी सांगितले. 

दरम्यान, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानविरोधात अत्याधुनिक प्रिसिजन गाइडेड मिसाइल, स्टील्थ ड्रोन आणि एंटी रेडिएशन शस्त्रांचा वापर केला. भारताचे हल्ले अचूक आणि गतीशील होते ज्यामुळे पाकिस्तानी एअरबेसवरून त्यांची लढाऊ विमाने उड्डाणच घेऊ शकली नाहीत. भारत या युद्धात अशा स्थितीत होता जिथे पाकिस्तानातील हवाई सैन्याला काहीच करता आले नसते. भारताने पाकच्या एअरबेसवर हल्ले करून यापुढच्या काळात पाकिस्तानने युद्धासाठी उकसवलं तर भारत काय करू शकतो हे दाखवून दिल्याचेही तज्ज्ञांनी म्हटलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदल