शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:38 IST

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे मुस्लिम देशांची व्यापारीक संबंध मजबूत झाले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे मुस्लिम देशांची संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. एकीकडे भारताचे पाकिस्तनसोबतचे संबंध दिवसेंदिवस बिघडत आहेत, तर दुसरीकडे सौदी, इराण, यूएईसारख्या देशांसोबतचे व्यावारीक संबंध मजबूत होत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तर अनेक देशांनी घटनेचे खंडन करताना, पाकिस्तानलाही सुनावले. दरम्यान, आता पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या यूएईने भारताचे कौतुक केल्यामुळे पाकिस्तानला आणखी मिरची लागली आहे. 

यूएईचे राजदूत अब्दुलनासेर अलशाली म्हणाले की, भारतीय नागरिकांसाठी यूएईच्या व्हिसा ऑन अरायव्हल कार्यक्रमाचा विस्तार हा भारतासोबतच्या त्यांच्या कायमस्वरुपी भागीदारीचे प्रतिबिंब आहे. हे एक व्यावहारिक पाऊल आहे, जे कुटुंबांना पुन्हा एकत्र येणे, व्यावसायिकांना सहकार्य करणे आणि सीमा ओलांडून व्यवसाय वाढवणे सोपे करेल. दोन गतिमान आणि दूरदर्शी राष्ट्र म्हणून, आम्ही आमच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणखी मजबूत पूल बांधण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

नवी दिल्लीतील यूएई मिशनने भारतीय नागरिकांसाठी वाढीव व्हिसा ऑन अरायव्हल धोरणाचे महत्त्व अधोरेखित कराना, द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारत यूएईच्या पर्यटन यशाचा आधारस्तंभ बनला आहे. एका अंदाजानुसार २०२३ मध्ये सुमारे ४.५ मिलियन भारतीयांनी यूएईला भेट दिली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक आणि सिंगापूर येथून वैध निवास परवाने असलेले भारतीय पासपोर्ट धारक यूएईच्या सर्व प्रवेश बिंदूंवर व्हिसा ऑन अरायव्हल मिळविण्यास पात्र असतील. 

गेल्या काही वर्षांपासून भारत-यूएई द्विपक्षीय संबंध वाढत आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक यूएई भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. २०२२ मध्ये दोन्ही बाजूंनी व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध लक्षणीयरीत्या विस्तारले. यूएई दूतावासाने एका निवेदनात म्हटले की, यूएई आणि भारतासारख्या खोल आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध असलेल्या देशांसाठी, गतिशीलता केवळ आवश्यक नाही तर परस्पर विश्वासाचे प्रतीक देखील आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक