शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:04 AM

बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.

इस्लामाबाद : बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.या ड्रोन विमानाचे छायाचित्र पाकिस्तानी लष्कराच्या आंतरदलीय जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर झळकवले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या हद्दीत भारताच्या जवानांनाच नव्हे, तर त्यांचे ड्रोनही येऊ दिले जाणार नाही.यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. भारताची चार ड्रोन विमाने गेल्या वर्षात पाडण्यात आली, असा दावाही पाकिस्तानी लष्कराने केला आहे.काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या पाठिंब्यानेच हा हल्ला झालेला होता. त्यामुळे त्याच महिन्यात २९ सप्टेंबर रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळावर लक्ष्यभेदी हल्ला केला. जशास तसे उत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी भारताविरुद्ध खूप आकांडतांडव केले होते. (वृत्तसंस्था)दहशतवादी कारवाया सुरूचपाकिस्तानातून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच राहिली आहे. ते काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवत असतात. पंजाबमध्येही खलिस्तान लिबरेशन फोर्सला हाताशी धरून आयएसआय या गुप्तहेर संघटनेने काही महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणला.या राज्यात दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. सीमेवर त्या देशाचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्करावर वारंवार गोळीबार करीत असतात. अशा स्थितीत टेहळणी करणारे भारतीय ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही पोकळ आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान