शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:01 IST

India-Pakistan : भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सतत भारतावर टीका करत आहे.

India-Pakistan :ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला तरी पाकिस्तान पुन्हा-पुन्हा भारताला युद्धाची धमकी देत ​​आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात की, भारत आम्हाला सतत धमकावत आहे. पण जर पुन्हा युद्ध झाले, तर आम्ही भारताला धडा शिकवू. कधी ते म्हणतात की, गोळ्यांनी उत्तर देऊ, तर कधी पाणी रोखण्याची धमकी देतात. पण, सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क आहे, अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली.

शहबाज शरीफ पुढे म्हणाले की, सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. आम्ही १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. आता, भारत आम्हाला पाण्यासाठी दिवसरात्र धमकावतो. या युद्धापूर्वी ज्या पद्धतीने धमक्या देत होता, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आहेत. आता, जर त्यांनी आणखी काही केले तर, आम्ही त्यांना धडा शिकवू, असेही ते यावेळी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या विधानाची भीतीअलीकडेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला होता. 'चुपचाप भाकरी खा, नाहीतर माझी गोळी तर आहेच' असे मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या विधानाची भीती स्पष्टपणे दिसून येते. शाहबाज शरीफपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण मोदींच्या या विधानावर टीका करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील भाषणादरम्यान मोदींच्या या विधानाचा उल्लेख केला, तर बिलावल भुट्टो अमेरिकेत मोदींच्या नावाने आरडाओरड करत आहेत. 

बिलावलची अमेरिकेतून चर्चेची मागणीबिलावल भुट्टो पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळासह अमेरिकेत पोहोचले आहेत आणि यादरम्यान त्यांनी भारताशी चर्चेची विनंती केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान