शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:10 IST

India Pakistan War : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत.

India Pakistan War : मागील काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान,  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताचा लष्करी हात बनण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सांगितले की, आम्ही भारताला आश्वासन देतो की जर त्यांनी दहशतवादी देश पाकिस्तानचा नाश करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर आम्ही पश्चिम सीमेवरून हल्ला करण्यास तयार आहोत.

भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते त्यांचे स्वागत करतील आणि भारतीय लष्करी शाखेला सहकार्य करेल, असंही त्यांनी सांगितले आहे. 

बीएलएने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये, बीएलएने लष्करी तळ, तपासणी केंद्रे, गुप्तचर संस्था, खनिज वाहतूक वाहनांना लक्ष्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने या हल्ल्यांना 'ऑपरेशन हिरोफ' च्या तयारीसाठी आयोजित केलेल्या लष्करी सरावांचा भाग म्हणून वर्णन केले आहे. या हल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूला हानी पोहोचवणे नव्हता तर लष्करी समन्वय, जमिनीवरील नियंत्रण आणि बचावात्मक स्थितीची चाचणी घेणे देखील होते. जेणेकरून बीएलए भविष्यातील संघटित युद्धासाठी स्वतःला तयार करू शकेल.

'ऑपरेशन हेरोफ' काय आहे?

बीएलएने २०२४ मध्ये 'ऑपरेशन हिरोफ' सुरू केले. बीएलएने या ऑपरेशनचे वर्णन स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक बहुआयामी मोहीम म्हणून केले. बलुचिस्तानवरील पाकिस्तानच्या नियंत्रणाविरुद्ध दशकांपासून सुरू असलेल्या प्रतिकार मोहिमेचा एक भाग म्हणूनही त्यांनी त्याचे वर्णन केले.

ऑपरेशन हिरोफच्या पहिल्या टप्प्यात, बीएलएने १३० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा आणि प्रमुख महामार्ग आणि प्रतिष्ठानांवर ताबा मिळवल्याचा दावा केला. यामध्ये बेला येथील लष्करी तळावर २० तासांचा ताबाचा समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत