शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:10 IST

India Pakistan War : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत.

India Pakistan War : मागील काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान,  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताचा लष्करी हात बनण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सांगितले की, आम्ही भारताला आश्वासन देतो की जर त्यांनी दहशतवादी देश पाकिस्तानचा नाश करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर आम्ही पश्चिम सीमेवरून हल्ला करण्यास तयार आहोत.

भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते त्यांचे स्वागत करतील आणि भारतीय लष्करी शाखेला सहकार्य करेल, असंही त्यांनी सांगितले आहे. 

बीएलएने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये, बीएलएने लष्करी तळ, तपासणी केंद्रे, गुप्तचर संस्था, खनिज वाहतूक वाहनांना लक्ष्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने या हल्ल्यांना 'ऑपरेशन हिरोफ' च्या तयारीसाठी आयोजित केलेल्या लष्करी सरावांचा भाग म्हणून वर्णन केले आहे. या हल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूला हानी पोहोचवणे नव्हता तर लष्करी समन्वय, जमिनीवरील नियंत्रण आणि बचावात्मक स्थितीची चाचणी घेणे देखील होते. जेणेकरून बीएलए भविष्यातील संघटित युद्धासाठी स्वतःला तयार करू शकेल.

'ऑपरेशन हेरोफ' काय आहे?

बीएलएने २०२४ मध्ये 'ऑपरेशन हिरोफ' सुरू केले. बीएलएने या ऑपरेशनचे वर्णन स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक बहुआयामी मोहीम म्हणून केले. बलुचिस्तानवरील पाकिस्तानच्या नियंत्रणाविरुद्ध दशकांपासून सुरू असलेल्या प्रतिकार मोहिमेचा एक भाग म्हणूनही त्यांनी त्याचे वर्णन केले.

ऑपरेशन हिरोफच्या पहिल्या टप्प्यात, बीएलएने १३० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा आणि प्रमुख महामार्ग आणि प्रतिष्ठानांवर ताबा मिळवल्याचा दावा केला. यामध्ये बेला येथील लष्करी तळावर २० तासांचा ताबाचा समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत