शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
3
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
4
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
5
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
6
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
7
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
8
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
9
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
10
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
11
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
12
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
13
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
14
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
15
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
17
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
18
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
19
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
20
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:10 IST

India Pakistan War : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत.

India Pakistan War : मागील काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान,  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताचा लष्करी हात बनण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सांगितले की, आम्ही भारताला आश्वासन देतो की जर त्यांनी दहशतवादी देश पाकिस्तानचा नाश करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर आम्ही पश्चिम सीमेवरून हल्ला करण्यास तयार आहोत.

भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते त्यांचे स्वागत करतील आणि भारतीय लष्करी शाखेला सहकार्य करेल, असंही त्यांनी सांगितले आहे. 

बीएलएने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये, बीएलएने लष्करी तळ, तपासणी केंद्रे, गुप्तचर संस्था, खनिज वाहतूक वाहनांना लक्ष्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने या हल्ल्यांना 'ऑपरेशन हिरोफ' च्या तयारीसाठी आयोजित केलेल्या लष्करी सरावांचा भाग म्हणून वर्णन केले आहे. या हल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूला हानी पोहोचवणे नव्हता तर लष्करी समन्वय, जमिनीवरील नियंत्रण आणि बचावात्मक स्थितीची चाचणी घेणे देखील होते. जेणेकरून बीएलए भविष्यातील संघटित युद्धासाठी स्वतःला तयार करू शकेल.

'ऑपरेशन हेरोफ' काय आहे?

बीएलएने २०२४ मध्ये 'ऑपरेशन हिरोफ' सुरू केले. बीएलएने या ऑपरेशनचे वर्णन स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक बहुआयामी मोहीम म्हणून केले. बलुचिस्तानवरील पाकिस्तानच्या नियंत्रणाविरुद्ध दशकांपासून सुरू असलेल्या प्रतिकार मोहिमेचा एक भाग म्हणूनही त्यांनी त्याचे वर्णन केले.

ऑपरेशन हिरोफच्या पहिल्या टप्प्यात, बीएलएने १३० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा आणि प्रमुख महामार्ग आणि प्रतिष्ठानांवर ताबा मिळवल्याचा दावा केला. यामध्ये बेला येथील लष्करी तळावर २० तासांचा ताबाचा समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत