शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:54 IST

India Pakistan War : गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. आता याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटले आहेत.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. याला भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर दिले. भारत दररोज पाकिस्तानच्या शहरांनाही लक्ष्य करत आहे, तर पाकिस्तानचे आकाशातील हल्ले अयशस्वी होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तान संसदेत युद्धाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा एका खासदाराने त्यांच्या सरकारला सुनावले. 

इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर टीका केली. शाहबाज शरीफ यांचे सरकार भित्रे आहे. ते इतके कमकुवत लोक आहेत की ते नरेंद्र मोदींचे नाव घेण्यासही घाबरतात. 

पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

खासदार शाहिद अहमद याने टिपू सुलतानच्या एका विधानाचा हवाला देत शाहबाज शरीफ यांची तुलना थेट कोल्ह्याशी केली. शाहिद अहमद म्हणाले, 'जर लष्कराचा नेता सिंह असेल आणि त्याच्या सैन्यात कोल्हे असतील, तरीही ते सिंहासारखे लढतात.' पण जर नेतृत्व कोल्ह्याच्या हातात असेल तर सिंहही त्यांची शक्ती गमावतात. जेव्हा तुमचे नेते आणि पंतप्रधान भित्रे असतील, तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आपल्याकडे असा नेता आहे जो नरेंद्र मोदींचे नावही घेत नाही, अशी टीका त्या खासदाराने केली.

"शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदींचे नावही घेतले नाही. त्याचे व्यावसायिक संबंध आहेत. ते त्याचे नावही घेऊ शकत नाहीत. नवाझ शरीफ यांनी भारताबद्दल एकही विधान केले नाही, असा आरोप त्या खासदाराने केला. 

'इम्रान खान यांना स्वार्थासाठी तुरुंगात टाकले'

इम्रान खान यांच्या खासदाराने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पाहता आपल्याला धैर्याने लढावे लागेल. मला असे म्हणायचे आहे की ते कोण लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इम्रान खान सारख्या नेत्याला कोंडून ठेवले आहे? माझ्या किंवा तुमच्या भाषणांमुळे समुदाय तुमच्यासोबत येणार नाही. काल आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला गेलो तेव्हा आम्हाला त्यासाठीही परवानगी देण्यात आली नाही. आम्हाला आशा होती की ते समाजासाठी काहीतरी बोलतील, जे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धParliamentसंसदViral Videoव्हायरल व्हिडिओ