शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 20:06 IST

India Pakistan Tension: भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. सामान्य लोकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. संपूर्ण देश एकसुरात पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणण्याची मागणी करत आहे.

दोन महिन्यांचा रेशनचा साठा करण्याचे निर्देश दरम्यान, भारत सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाक सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांचे राशन साठवण्याचे आवाहन केले आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की, 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी तयार या 13 मतदारसंघांमध्ये अन्न, औषधे आणि इतर सर्व मूलभूत गरजा पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी देखील तयार करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवरील भागातील रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणा देखील तैनात केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच म्हटले की, भारत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय पुरावे त्यांच्याकडे आहेत. या भीतीमुळे पीओकेमधील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी 10 दिवसांसाठी 1000 हून अधिक धार्मिक शाळा बंद ठेवल्या आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध