शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
4
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
5
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
6
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
7
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
8
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
9
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
10
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
11
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
12
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
13
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
14
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
15
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
16
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
17
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
19
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
20
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:09 IST

भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळेचिंता वाढली आहे.

भारतासहपाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोट आणि तरनतारन सारख्या जिल्ह्यांपासून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत, नद्यांना पूर आला आहे. धुसी धरण फुटल्यामुळे आणि करतारपूर कॉरिडॉरभोवती पाणी साचल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

दोन्ही बाजूंचे हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. मान्सूनच्या पावसामुळे भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही बाजूंची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाघा बॉर्डरवरील फोटोंमध्ये, संपूर्ण परिसर पाण्यात बुडालेला दिसत आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...

अनेक गावं पाण्याखाली

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात रावी नदीच्या जलप्रवाहामुळे डेरा बाबा नानक येथील श्री करतारपूर कॉरिडॉर दर्शन स्थळ येथे बांधलेलं धुसी धरण फुटलं. त्यानंतर संपूर्ण परिसरात पाणी शिरलं आणि अनेक गावं पाण्याखाली गेली. धुसी धरण फुटल्यामुळे हजारो एकर शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे. डेरा बाबा नानक शहरातील घरं पाण्याखाली गेली आहेत आणि लोक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत. विध्वंसाची स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.

सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, २,१०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तिथे पुरामुळे गावं पाण्याखाली जात आहेत आणि पावसामुळे जलद वाहणारं पाणी भारतीय बॉर्डरकडे येत आहे, ज्यामुळे सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या पुलाखालून जलद प्रवाहात वाहणारे पाणी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी धोक्याचं आहे. 

टॅग्स :floodपूरIndiaभारतPakistanपाकिस्तानRainपाऊस