शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:09 IST

भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळेचिंता वाढली आहे.

भारतासहपाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोट आणि तरनतारन सारख्या जिल्ह्यांपासून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत, नद्यांना पूर आला आहे. धुसी धरण फुटल्यामुळे आणि करतारपूर कॉरिडॉरभोवती पाणी साचल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

दोन्ही बाजूंचे हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. मान्सूनच्या पावसामुळे भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही बाजूंची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाघा बॉर्डरवरील फोटोंमध्ये, संपूर्ण परिसर पाण्यात बुडालेला दिसत आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...

अनेक गावं पाण्याखाली

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात रावी नदीच्या जलप्रवाहामुळे डेरा बाबा नानक येथील श्री करतारपूर कॉरिडॉर दर्शन स्थळ येथे बांधलेलं धुसी धरण फुटलं. त्यानंतर संपूर्ण परिसरात पाणी शिरलं आणि अनेक गावं पाण्याखाली गेली. धुसी धरण फुटल्यामुळे हजारो एकर शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे. डेरा बाबा नानक शहरातील घरं पाण्याखाली गेली आहेत आणि लोक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत. विध्वंसाची स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.

सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, २,१०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तिथे पुरामुळे गावं पाण्याखाली जात आहेत आणि पावसामुळे जलद वाहणारं पाणी भारतीय बॉर्डरकडे येत आहे, ज्यामुळे सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या पुलाखालून जलद प्रवाहात वाहणारे पाणी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी धोक्याचं आहे. 

टॅग्स :floodपूरIndiaभारतPakistanपाकिस्तानRainपाऊस