शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:09 IST

भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळेचिंता वाढली आहे.

भारतासहपाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोट आणि तरनतारन सारख्या जिल्ह्यांपासून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत, नद्यांना पूर आला आहे. धुसी धरण फुटल्यामुळे आणि करतारपूर कॉरिडॉरभोवती पाणी साचल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

दोन्ही बाजूंचे हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. मान्सूनच्या पावसामुळे भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही बाजूंची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाघा बॉर्डरवरील फोटोंमध्ये, संपूर्ण परिसर पाण्यात बुडालेला दिसत आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...

अनेक गावं पाण्याखाली

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात रावी नदीच्या जलप्रवाहामुळे डेरा बाबा नानक येथील श्री करतारपूर कॉरिडॉर दर्शन स्थळ येथे बांधलेलं धुसी धरण फुटलं. त्यानंतर संपूर्ण परिसरात पाणी शिरलं आणि अनेक गावं पाण्याखाली गेली. धुसी धरण फुटल्यामुळे हजारो एकर शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे. डेरा बाबा नानक शहरातील घरं पाण्याखाली गेली आहेत आणि लोक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत. विध्वंसाची स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.

सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, २,१०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तिथे पुरामुळे गावं पाण्याखाली जात आहेत आणि पावसामुळे जलद वाहणारं पाणी भारतीय बॉर्डरकडे येत आहे, ज्यामुळे सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या पुलाखालून जलद प्रवाहात वाहणारे पाणी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी धोक्याचं आहे. 

टॅग्स :floodपूरIndiaभारतPakistanपाकिस्तानRainपाऊस