शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:06 IST

India-Pakistan Ceasefire News: 'पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही, म्हणून युद्धविरामचे आवाहन केले.'

India-Pakistan Ceasefire :भारताच्याऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ आणि खोट्या दाव्यांवर ऑस्ट्रेलियन लष्करी तज्ज्ञ टॉम कूपर यांनी शाहबाज शरीफ सरकारला आरसा दाखवला आहे. त्यांनी 3-4 दिवस चाललेल्या या कारवाईचे वर्णन भारताचा विजय म्हणून केले. तसेच, पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्यामुळेच त्यांनी युद्धविरामाचे आवाहन केल्याचा दावा केला. 

टॉम कूपर हे जगातील प्रतिष्ठित युद्ध इतिहासकारांपैकी एक आहेत. ते मध्य पूर्व ते दक्षिण आशियापर्यंतच्या हवाई युद्धाचे विश्लेषक, लेखक आणि तज्ज्ञ आहेत. 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतानेही या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. टॉम कूपर यांनी या आठवडाभर चाललेल्या घटनाक्रमावर एक ब्लॉग लिहिला आहे.

टॉम कूपर यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही. भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानात घुसून कारवाई केली, त्यावरुन पाकिस्तानचा पराभव दिसून येतो. या कारणास्तव, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आवाहन करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क साधला होता. कूपर यांनी याला भारताचा स्पष्ट विजय म्हटले आहे.

टॉम कूपर आपल्या ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, मी नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगतो. जेव्हा एक बाजू दुसऱ्याच्या अण्वस्त्रांच्या डेपोवर हल्ले करते आणि दुसरी बाजू काहीही करण्याच्या स्थितीत नसते, तेव्हा माझ्या मते हा एक स्पष्ट विजय आहे. पाकिस्तानने युद्धविरामाचे आवाहन करणे आश्चर्यकारक नाही. 

टॉम कूपरच्या मते, ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान पाच मुख्य दहशतवादी आणि इतर 140 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान सरकारने मौन बाळगले, परंतु आयएसआयने या दहशतवाद्यांना शहीद घोषित केले आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह त्यांना राज्य सन्मान दिला. हे दहशतवाद्यांचा लष्कराशी थेट संबंध असल्याचे सांगण्यासाठी पुरेसे आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची भारताची कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली आणि पाकिस्तान अपयशी ठरला. भारताने केवळ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला नाही, तर पाकिस्तानचे हल्ले देखील प्रभावीपणे रोखले. याशिवाय, भारताने रावळपिंडी आणि कराची सारख्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये बसवलेली हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 देखील नष्ट केली आणि शेवटी पाकिस्तान मागे पडला, असेही कूपर यांनी म्हटले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान