शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:06 IST

India-Pakistan Ceasefire News: 'पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही, म्हणून युद्धविरामचे आवाहन केले.'

India-Pakistan Ceasefire :भारताच्याऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ आणि खोट्या दाव्यांवर ऑस्ट्रेलियन लष्करी तज्ज्ञ टॉम कूपर यांनी शाहबाज शरीफ सरकारला आरसा दाखवला आहे. त्यांनी 3-4 दिवस चाललेल्या या कारवाईचे वर्णन भारताचा विजय म्हणून केले. तसेच, पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्यामुळेच त्यांनी युद्धविरामाचे आवाहन केल्याचा दावा केला. 

टॉम कूपर हे जगातील प्रतिष्ठित युद्ध इतिहासकारांपैकी एक आहेत. ते मध्य पूर्व ते दक्षिण आशियापर्यंतच्या हवाई युद्धाचे विश्लेषक, लेखक आणि तज्ज्ञ आहेत. 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतानेही या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. टॉम कूपर यांनी या आठवडाभर चाललेल्या घटनाक्रमावर एक ब्लॉग लिहिला आहे.

टॉम कूपर यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही. भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानात घुसून कारवाई केली, त्यावरुन पाकिस्तानचा पराभव दिसून येतो. या कारणास्तव, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आवाहन करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क साधला होता. कूपर यांनी याला भारताचा स्पष्ट विजय म्हटले आहे.

टॉम कूपर आपल्या ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, मी नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगतो. जेव्हा एक बाजू दुसऱ्याच्या अण्वस्त्रांच्या डेपोवर हल्ले करते आणि दुसरी बाजू काहीही करण्याच्या स्थितीत नसते, तेव्हा माझ्या मते हा एक स्पष्ट विजय आहे. पाकिस्तानने युद्धविरामाचे आवाहन करणे आश्चर्यकारक नाही. 

टॉम कूपरच्या मते, ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान पाच मुख्य दहशतवादी आणि इतर 140 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान सरकारने मौन बाळगले, परंतु आयएसआयने या दहशतवाद्यांना शहीद घोषित केले आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह त्यांना राज्य सन्मान दिला. हे दहशतवाद्यांचा लष्कराशी थेट संबंध असल्याचे सांगण्यासाठी पुरेसे आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची भारताची कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली आणि पाकिस्तान अपयशी ठरला. भारताने केवळ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला नाही, तर पाकिस्तानचे हल्ले देखील प्रभावीपणे रोखले. याशिवाय, भारताने रावळपिंडी आणि कराची सारख्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये बसवलेली हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 देखील नष्ट केली आणि शेवटी पाकिस्तान मागे पडला, असेही कूपर यांनी म्हटले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान