शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Afghanistan Crisis: प्रत्येक जीव महत्त्वाचा! ४ महिन्यांचा चिमुरडा संकटात सापडला; सुटकेसाठी भारतानं नियम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:47 IST

Afghanistan Crisis: ना कागदपत्रांची फिकीर, ना आंतरराष्ट्रीय नियमांची परवा; भारत सरकारनं चिमुरड्यासाठी कायदा मोडला

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केल्यानं लाखो लोकांवर संकट निर्माण झालं आहे. तालिबानी राजवट अनुभवलेल्या अनेकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं मिशन देवी शक्ती सुरू केलं आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांनादेखील मदतीचा हात दिला जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या एका चिमुरड्याला वाचवण्यासाठी भारतानं संपूर्ण प्रक्रिया बाजूला ठेवली. कोणतीही कागदपत्रं नसताना केवळ माणुसकीच्या भावनेतून भारतानं चिमुरड्याला मदतीचा हात दिला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा नियमदेखील मोडण्यात आला.

आपल्या देशात काय चाललंय, लोकांवर किती मोठं संकट आहे याची पुसटशीही कल्पना ४ महिन्यांच्या इखनूर सिंहला नाही. आई-वडिलांनी त्याचा पासपोर्ट तयार केलेला नाही. मात्र तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करताच इखनूरच्या आई वडिलांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आमच्याकडे इखनूरचा पासपोर्ट नाही. पण सुरक्षेची खूप काळजी वाटते, अशा शब्दांत लहानग्याच्या आई वडिलांनी पोटच्या पोराबद्दल चिंता व्यक्त केली. मदतीसाठी पदर पसरला.

जीव महत्त्वाचा, भारतानं नियम मोडलाभारतीय अधिकाऱ्यांनी इखनूरच्या आई वडिलांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. कागदपत्रांची चिंता, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी असलेले नियम बाजूला ठेवण्यात आले. इखनूरला त्याच्या आई वडिलांसोबत विमानानं भारतात पाठवण्यात आलं. इखनूर आई वडिलांसोबत विमानात असताना कागदपत्रं तयार करण्यात आली. काबुलहून निघालेलं विमान जेव्हा हिंडन विमानतळावर उतरलं तेव्हा सगळी औपचारिकता पूर्ण झालेली होती. अफगाणिस्तानातील संकट लक्षात घेऊन हिंडन विमानतळावरच फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.

भारतीय अधिकाऱ्यांचे मानले आभारइखनूरसाठी भारतीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता पाहून त्याचे वडील केरपाल सिंह भारावून गेले. गेल्या १० दिवसांत अफगाणिस्तानात पाहिलेली भयानक परिस्थिती आजही त्यांच्या डोळ्यांपुढून जात नाही. केरपाल यांच्या कुटुंबात ५ सदस्य आहेत. स्वत:सह पत्नी आणि दोन मुलांचा पासपोर्ट त्यांच्याकडे आहे. पण इखनूरचा पासपोर्ट नसल्यानं अफागाणिस्तान सोडणं अवघड होतं. मात्र भारतीय अधिकारी अगदी देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान