शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: प्रत्येक जीव महत्त्वाचा! ४ महिन्यांचा चिमुरडा संकटात सापडला; सुटकेसाठी भारतानं नियम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:47 IST

Afghanistan Crisis: ना कागदपत्रांची फिकीर, ना आंतरराष्ट्रीय नियमांची परवा; भारत सरकारनं चिमुरड्यासाठी कायदा मोडला

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केल्यानं लाखो लोकांवर संकट निर्माण झालं आहे. तालिबानी राजवट अनुभवलेल्या अनेकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं मिशन देवी शक्ती सुरू केलं आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांनादेखील मदतीचा हात दिला जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या एका चिमुरड्याला वाचवण्यासाठी भारतानं संपूर्ण प्रक्रिया बाजूला ठेवली. कोणतीही कागदपत्रं नसताना केवळ माणुसकीच्या भावनेतून भारतानं चिमुरड्याला मदतीचा हात दिला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा नियमदेखील मोडण्यात आला.

आपल्या देशात काय चाललंय, लोकांवर किती मोठं संकट आहे याची पुसटशीही कल्पना ४ महिन्यांच्या इखनूर सिंहला नाही. आई-वडिलांनी त्याचा पासपोर्ट तयार केलेला नाही. मात्र तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करताच इखनूरच्या आई वडिलांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आमच्याकडे इखनूरचा पासपोर्ट नाही. पण सुरक्षेची खूप काळजी वाटते, अशा शब्दांत लहानग्याच्या आई वडिलांनी पोटच्या पोराबद्दल चिंता व्यक्त केली. मदतीसाठी पदर पसरला.

जीव महत्त्वाचा, भारतानं नियम मोडलाभारतीय अधिकाऱ्यांनी इखनूरच्या आई वडिलांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. कागदपत्रांची चिंता, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी असलेले नियम बाजूला ठेवण्यात आले. इखनूरला त्याच्या आई वडिलांसोबत विमानानं भारतात पाठवण्यात आलं. इखनूर आई वडिलांसोबत विमानात असताना कागदपत्रं तयार करण्यात आली. काबुलहून निघालेलं विमान जेव्हा हिंडन विमानतळावर उतरलं तेव्हा सगळी औपचारिकता पूर्ण झालेली होती. अफगाणिस्तानातील संकट लक्षात घेऊन हिंडन विमानतळावरच फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.

भारतीय अधिकाऱ्यांचे मानले आभारइखनूरसाठी भारतीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता पाहून त्याचे वडील केरपाल सिंह भारावून गेले. गेल्या १० दिवसांत अफगाणिस्तानात पाहिलेली भयानक परिस्थिती आजही त्यांच्या डोळ्यांपुढून जात नाही. केरपाल यांच्या कुटुंबात ५ सदस्य आहेत. स्वत:सह पत्नी आणि दोन मुलांचा पासपोर्ट त्यांच्याकडे आहे. पण इखनूरचा पासपोर्ट नसल्यानं अफागाणिस्तान सोडणं अवघड होतं. मात्र भारतीय अधिकारी अगदी देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान