शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

भारतासाठी महत्त्वाचं असलेलं चाबहार बंदर 2018पर्यंत सुरू होणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 8:31 AM

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केलीचाबहार हे बंदर इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित आहे. त्यामुळे आता पाकिस्तान मार्गे न जाताच पश्चिमी तटावरून इराणला सहजगत्या पोहोचता येणार आहे. चाबहार विकासासाठीच्या काही निविदांना अंतिम मंजुरीही देण्यात आली असून, हे बंदर चालू झाल्यास भारताचा मोठा फायदा होणार आहे.

तेहरान, दि. 6 - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेली नितीन गडकरी हे भारताचं प्रतिनिधित्व करतायत. दुस-यांना राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल हसन रुहानी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच रुहानी यांनीही भारत-इराण द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचंही प्रतिपादन केलं आहे.तेहरानमध्ये गडकरी म्हणाले, भारत आणि इराण यांच्यात विशेष ऐतिहासिक नात्याची वीण घट्ट आहे. भारत सरकार चाबहार बंदराचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आम्हाला आशा आहे की, चाबहार बंद हे येत्या एक ते दीड वर्षांत वाहतुकीसाठी खुलं होईल. भारत सरकारही चाबहार बंदर विकासासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे. चाबहार हे बंदर इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित आहे. त्यामुळे आता पाकिस्तान मार्गे न जाताच पश्चिमी तटावरून इराणला सहजगत्या पोहोचता येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचा हा इराण दौरा भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारतानं जलद गतीनं कामाला सुरुवात केली आहे. चाबहार बंदर विकासासाठी भारतानं काम सुरू केलं असून, बंदरावर काही उपकरणंही बसवण्यात येणार आहेत. तसेच चाबहार विकासासाठीच्या काही निविदांना अंतिम मंजुरीही देण्यात आली असून, हे बंदर चालू झाल्यास भारताचा मोठा फायदा होणार आहे. चाबहार बंदर विकासासाठी 600 कोटींच्या उपकरणं बसवण्यात येणार असून, त्यासाठी 380 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी मिळाली आहे.  

गेल्या दोन वर्षांपूर्वीच नरेंद्र मोदींनी इराण दौऱ्यात चाबहार बंदराच्या संदर्भातला करार केला आणि गेली तेरा वर्षे रखडलेला एक महत्त्वाचा विषय मार्गी लावला होता. या कराराच्या वेळी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी हेसुद्धा मुद्दाम हजर राहिले होते. चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारत इराणमध्ये तब्बल पाचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून, त्यात जपानसुद्धा सहाय्य करणार आहे. हे बंदर इराण, भारत, मध्य आशिया, अफगाणिस्तान तसेच, पूर्व युरोपला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चाबहारबरोबरच मोदी व रौहानी यांनी अनेक तेल, गॅस, रेल्वे, ऊर्जा आदी क्षेत्रांतील विविध करार केले होते. या करारांमुळे भारताला इराणमध्ये जम बसविण्याचा तसंच, पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तान, रशिया व थेट पूर्व युरोपापर्यंत थेट पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे भारताचा व्यापारी माल इराणमध्ये उतरवून त्यानंतर रेल्वे व रस्ते वाहतुकीद्वारे अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियात नेता येणार आहे. इराणकडे अत्यंत स्वस्त नैसर्गिक गॅस व वीज आहे. ही स्वस्त वीज व गॅस मिळविण्याचा व युरिया निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा भारताचा विचार आहे.पाकिस्तानचे ग्वादर बंदर विकसित करून तिथून थेट चीनपर्यंत एक कॉरिडॉर विकसित करण्याचे काम चीनने सुरू केले आहे. ते पुढच्या वर्षात पूर्ण झाले की चीनला पाकिस्तानच्या पश्चिमेकडच्या बंदरापर्यंत सहजपणे येता येईल आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या भागावर नियंत्रण आणता येईल. अरबी समुद्रावर आणि त्याद्वारे हिंदी महासागराच्या महत्त्वाच्या भूभागावर नियंत्रण आणून भारताला दबावाखाली आणण्यासाठी चीनला याचा उपयोग होणार आहे. चाबहार आणि ग्वादर यांच्यात जेमतेम दोनशे किलोमीटरचे अंतर आहे. यावरून विषयाचे महत्त्व किती आहे हे समजू शकते. चाबहार करार म्हणजे भारताने चीनच्या ग्वादरनीतीला दिलेले चोख उत्तर असल्याचे मानले जाते, पण पाकिस्तानमध्येसुद्धा या विषयाकडे तिथले जाणकार त्याच भूमिकेतून पाहत आहेत.