शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:41 IST

पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे असं विधान बिलावल भुट्टो यांनी केले आहे.

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु जल कराराला दिलेल्या स्थगितीचा वाद आणखी चिघळला आहे. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर पाकचा थयथयाट झाला असून तिथले माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला थेट युद्धाची पोकळ धमकी दिली आहे. भारताची सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्याचा कुठलाही विचार नाही असं अमित शाह यांनी म्हटले होते. त्यावर पाकिस्तानातील नेते बिथरले आहेत. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिलावल भुट्टो यांनी म्हटलं की, सिंधु जल करार पुन्हा पूर्ववत न केल्यास पाकिस्तान हल्ला करून सर्व ६ नद्यांवर कब्जा करू शकते. भारताकडे केवळ २ पर्याय आहेत. एकतर भारताने सिंधु जल करार सुरू ठेवावा, पुढे तेच राहावे अथवा पाकिस्तानसोबत युद्धास तयार राहावे असं त्यांनी एका रॅलीत म्हटलं आहे. याआधीही बिलावल भुट्टो यांनी सिंधु जल करारावर एक तर नद्यातून पाणी वाहेल नाहीतर रक्त वाहेल असं आक्रमक विधान केले होते. 

तसेच पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे. ही पाकिस्तानच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जावे लागेल. आम्ही सिंधु सभ्यतेचे संरक्षक आहोत आणि त्याचे रक्षण करू आणि त्यासाठी युद्धाला सामोरे जायचीही आमची तयारी आहे. या मुद्द्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप व्हावा लागेल. जर पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखले तर युद्धाशिवाय अन्य पर्याय नाही असंही बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधु जल कराराला स्थगिती दिली होती. त्यावेळी जर भारताने सिंधु नदीचे पाणी थांबवले तर त्याला आम्ही युद्धाची घोषणा मानू असं पाकिस्तानने म्हटले. अलीकडेच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधु जल करार पूर्ववत करण्याबाबत चर्चा फेटाळली. हा करार पुन्हा कधी पूर्ववत होणार नाही असं शाह यांनी स्पष्ट म्हटले. अमित शाह यांच्या विधानावरूनच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.

काय आहे सिंधु जल करार?

सिंधु जल करार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नद्यांच्या पाणी वाटपावर आहे. गेल्या ६ दशकापूर्वी या करारानुसार सिंधु, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्याचे ठरले तर रावी, ब्यास आणि सतलुज नद्याचे पाणी भारताच्या वाट्याला आले. त्यामुळे सिंधु जल कराराला स्थगिती दिल्याने पाकमध्ये भविष्य काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAmit Shahअमित शाह