शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:07 IST

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे.

काबूल: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे. (india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories)

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतही चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात तैनात असलेले भारतीय अधिकारी व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बर्‍याच भागांचा ताबा घेतल्याने सुरक्षा परिस्थिती वेगाने ढासळत आहे. त्यामुळे आपल्या अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत भारत सरकार त्यांना अफगाणिस्तानबाहेर काढणार आहे.

आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

भारताचे चार वाणिज्य दूतावास

अफगाणिस्तानमध्ये भारताचे चार वाणिज्य दूतावास होते. हे दूतावास काबूल येथील दूतावासाच्या संपर्कात होते. अफगाणिस्तानमधून भारतीय दूतावासातील सर्वच कर्मचाऱ्यांना भारतात पुन्हा आणणार की, काही कर्मचारी तेथेच राहणार, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जगातील काही देशांनी तालिबानसोबत चर्चा सुरू केली आहे. तर, भारतीय अधिकाऱ्यांनीही तालिबान नेत्यांची भेट घेतली असल्याचा दावा कतारच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर नाटोनेही आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तालिबानने बर्‍याच ठिकाणांचा ताबा घेतला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयS. Jaishankarएस. जयशंकर