शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:07 IST

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे.

काबूल: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे. (india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories)

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतही चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात तैनात असलेले भारतीय अधिकारी व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बर्‍याच भागांचा ताबा घेतल्याने सुरक्षा परिस्थिती वेगाने ढासळत आहे. त्यामुळे आपल्या अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत भारत सरकार त्यांना अफगाणिस्तानबाहेर काढणार आहे.

आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

भारताचे चार वाणिज्य दूतावास

अफगाणिस्तानमध्ये भारताचे चार वाणिज्य दूतावास होते. हे दूतावास काबूल येथील दूतावासाच्या संपर्कात होते. अफगाणिस्तानमधून भारतीय दूतावासातील सर्वच कर्मचाऱ्यांना भारतात पुन्हा आणणार की, काही कर्मचारी तेथेच राहणार, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जगातील काही देशांनी तालिबानसोबत चर्चा सुरू केली आहे. तर, भारतीय अधिकाऱ्यांनीही तालिबान नेत्यांची भेट घेतली असल्याचा दावा कतारच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर नाटोनेही आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तालिबानने बर्‍याच ठिकाणांचा ताबा घेतला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयS. Jaishankarएस. जयशंकर