शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

India China FaceOff: अ‍ॅप बंद केल्याची मोजावी लागेल किंमत; चीनने दिला भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:05 IST

सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर यांनी भारतातील मोबाइल फोनमधून ही अ‍ॅप ब्लॉक केली आहेत.

बीजिंग : भारताने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या चीनने भारताला याची मोठी आर्थिक व अन्य प्रकारची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ग्लोबल टाइम्समध्ये याबाबचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये चिनी गुंतवणूकदार तसेच व्यापारी भारताच्या या राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या कृतीला चोख प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या कोरोनाचा फटका सहन करीत आहे. याच काळात चीनची अ‍ॅप बंद करण्याचा सरकारच्या निर्णयाने चीनमधील गुंतवणूकदार आणि व्यापारी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे भारतात गुंतवणूक करण्याबाबत त्यांच्याकडून विचार केला जाईल, असे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमा वाद हा जुना आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही देशांमध्ये आता आर्थिक चढाओढही सुरू झाली आहे.

सन २०१७मध्ये झालेल्या डोकलाम संघर्षाच्या वेळी भारताला झालेले आर्थिक नुकसान मर्यादित होते. मात्र यावेळी भारताला मोठा आर्थिक फटका आम्ही देऊ शकतो, असे चिनी दैनिकाने म्हटले आहे. भारताला चीनबरोबर आर्थिक युद्ध परवडणारे नसल्याचेही या दैनिकाने म्हटले आहे.गुगल, अ‍ॅपलच्या अ‍ॅप्स स्टोअरमध्ये ब्लॉक

  • सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर यांनी भारतातील मोबाइल फोनमधून ही अ‍ॅप ब्लॉक केली आहेत.
  • सरकारने बंदी घातलेली अ‍ॅप आमच्या भारतातील प्ले स्टोअरमध्ये तात्पुरती ब्लॉक करण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे. मात्र किती अ‍ॅप ब्लॉक केली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर्सनेही असेच केले आहे.
  • टिकटॉक अ‍ॅप हे पूर्णपणे बंद झाले असून, त्याचे भारतातील काम पूर्णपणे थांबले आहे. याशिवाय यूसी ब्राऊजर, शेअर ईट, वुई चॅट, कॅमस्कॅनर आणि एमआय कम्युनिटी ही अ‍ॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आली आहे.
  • बिगो लाइव्ह या बंदी घातलेल्या अ‍ॅपने आपण काही काळासाठी प्ले स्टोअरवरून आपले अ‍ॅप काढून घेतले असल्याचे जाहीर केले आहे.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावgoogleगुगल