शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:04 IST

india china faceoff : पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केली आहेत.

बीजिंगः भारताच्या कठोर भूमिकेनंतर गलवान खो-यातून चिनी सैनिक तंबू काढून मागे फिरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला इशारा देण्यात आला आहे. लडाखच्या सीमावर्ती भागात भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे उड्डाण करत आहे. तसेच भारतानं टी- 90 टँक रणगाडेही तैनात केले आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला थेट धमकी देण्यात आली आहे. जर भारताने कोणतीही आक्रमक कारवाई केली, तर आम्ही त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केल्याचंही ग्लोबल टाइम्समधून सांगण्यात आलं आहे.भारत लडाखच्या सीमावर्ती भागात सतत सैन्याची जमवाजमव करीत आहे आणि युद्धसराव करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाइम्सने केला आहे. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, पीएलएने त्याच्या वायव्य सीमेवर अनेक रॉकेट लाँचर्स, तोफा, अँटी-टॅंक क्षेपणास्त्रे, विमानविरोधी बंदुका आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. ग्लोबल टाइम्सने सांगितले की, ही शस्त्रे खास उंचावरील भागात लढाईसाठी तयार केली गेली आहेत. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारताने नुकतेच आपल्या आघाडीच्या मोर्चांवर अपाचे ही लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त भारताने गलवान खो-यात टी -टँक रणगाडेही तयार ठेवले आहेत.ग्लोबल टाइम्सने कथित लष्करी तज्ज्ञांचा हवाला देत म्हणलं आहे की, पीएलएनं उंच भागात लढाईसाठी खूप उपयुक्त अशी शस्त्रास्त्रं आणि लढाऊ हेलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. भारतानं आक्रमक केल्या चिनी शस्त्रे भारताला नेस्तनाबूत करतील. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, भारताशी असलेला तणाव कमी करण्याबाबत सहमती दर्शविली गेली असली तरी चिनी सैन्य भारताच्या कोणत्याही भडकाऊ कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थितीनंतर चीनकडून शेवटी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लडाखच्या गलवान खो-यात 15 जूनला भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीनंतर एकीकडे चिनी नेते शांततेबद्दल बोलत होते, दुसरीकडे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आपली शक्ती वाढवत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत होती.चीनच्या सैन्याने 1.2 किमी घेतली माघारआता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमधील चर्चेनंतर चिनी सैनिकांनीही माघार घेतल्याचे उपग्रहाच्या ताज्या छायाचित्रांमधून दिसत आहे. अमेरिकेची अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सरने उपग्रहाच्या माध्यमातून गलवान खोऱ्यातील ताजे फोटो टिपले असून, ते सार्वजनिक केले आहेत. ओपन सोर्स इंटेलिजन्स विश्लेषक डेटरेस्फा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील वाटाघाटीनंतर यावर सहमती झाली. सॅटेलाइट फोटोंच्या आधारे असे म्हणता येईल की, चीनचा ताफा 1.2 किमीने मागे गेला आहे.

हेही वाचा

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन