शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:04 IST

india china faceoff : पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केली आहेत.

बीजिंगः भारताच्या कठोर भूमिकेनंतर गलवान खो-यातून चिनी सैनिक तंबू काढून मागे फिरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला इशारा देण्यात आला आहे. लडाखच्या सीमावर्ती भागात भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे उड्डाण करत आहे. तसेच भारतानं टी- 90 टँक रणगाडेही तैनात केले आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला थेट धमकी देण्यात आली आहे. जर भारताने कोणतीही आक्रमक कारवाई केली, तर आम्ही त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केल्याचंही ग्लोबल टाइम्समधून सांगण्यात आलं आहे.भारत लडाखच्या सीमावर्ती भागात सतत सैन्याची जमवाजमव करीत आहे आणि युद्धसराव करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाइम्सने केला आहे. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, पीएलएने त्याच्या वायव्य सीमेवर अनेक रॉकेट लाँचर्स, तोफा, अँटी-टॅंक क्षेपणास्त्रे, विमानविरोधी बंदुका आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. ग्लोबल टाइम्सने सांगितले की, ही शस्त्रे खास उंचावरील भागात लढाईसाठी तयार केली गेली आहेत. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारताने नुकतेच आपल्या आघाडीच्या मोर्चांवर अपाचे ही लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त भारताने गलवान खो-यात टी -टँक रणगाडेही तयार ठेवले आहेत.ग्लोबल टाइम्सने कथित लष्करी तज्ज्ञांचा हवाला देत म्हणलं आहे की, पीएलएनं उंच भागात लढाईसाठी खूप उपयुक्त अशी शस्त्रास्त्रं आणि लढाऊ हेलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. भारतानं आक्रमक केल्या चिनी शस्त्रे भारताला नेस्तनाबूत करतील. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, भारताशी असलेला तणाव कमी करण्याबाबत सहमती दर्शविली गेली असली तरी चिनी सैन्य भारताच्या कोणत्याही भडकाऊ कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थितीनंतर चीनकडून शेवटी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लडाखच्या गलवान खो-यात 15 जूनला भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीनंतर एकीकडे चिनी नेते शांततेबद्दल बोलत होते, दुसरीकडे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आपली शक्ती वाढवत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत होती.चीनच्या सैन्याने 1.2 किमी घेतली माघारआता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमधील चर्चेनंतर चिनी सैनिकांनीही माघार घेतल्याचे उपग्रहाच्या ताज्या छायाचित्रांमधून दिसत आहे. अमेरिकेची अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सरने उपग्रहाच्या माध्यमातून गलवान खोऱ्यातील ताजे फोटो टिपले असून, ते सार्वजनिक केले आहेत. ओपन सोर्स इंटेलिजन्स विश्लेषक डेटरेस्फा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील वाटाघाटीनंतर यावर सहमती झाली. सॅटेलाइट फोटोंच्या आधारे असे म्हणता येईल की, चीनचा ताफा 1.2 किमीने मागे गेला आहे.

हेही वाचा

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन