शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं अफगाणिस्तानात केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचं काय? तालिबानचं स्पष्ट अन् थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:46 IST

भारतीय कंपन्यांची तालिबानमध्ये मोठी गुंतवणूक; शेकडो प्रकल्पांची कंत्राटं भारतीय कंपन्यांकडे

काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानात तैनात असलेलं अमेरिकन सैन्य माघारी परतताच तालिबाननं आक्रमक कारवाया सुरू केल्या. आता संपूर्ण देशावर तालिबानचा अंमल आहे. त्यामुळे देशातील जनता दहशतीखाली आहे. लाखो लोक देश सोडून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता तालिबाननं भारताबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तालिबान कोणत्याही देशाला अफगाणिस्तानची जमीन दुसऱ्या देशावर कारवाई करण्यासाठी वापरू देणार नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्यांना सांगितलं. पाकिस्तानच्या हम वृत्तवाहिनीला सोमवारी रात्री तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी मुलाखत दिली. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच तालिबाननं आपली विविध मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट केली. 

भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. संपूर्ण देशात भारतीय कंपन्या विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. तालिबानमुळे ही सर्व गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर सुहेल शाहीन यांनी तालिबानची भूमिका मांडली. 'भारत अफगाणिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत आहे. विविध विकास प्रकल्प, मुलभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. भारत हे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करू शकतो. कारण ते लोकांसाठी आहेत,' असं शाहीन म्हणाले.

आमच्या भूमीचा वापर कोणत्याही देशानं इतर राष्ट्रांवर कारवाई करण्यासाठी करू नये. आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या धोरणात ही गोष्ट बसत नाही, असं शाहीन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. भारताची अफगाणिस्तानसोबत चर्चा सुरू आहे. भारतानं तालिबानच्या सत्तेला मान्यता दिलेली नाही. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सरकारनं माघारी बोलावलं आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान