शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

भारतानं अफगाणिस्तानात केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचं काय? तालिबानचं स्पष्ट अन् थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:46 IST

भारतीय कंपन्यांची तालिबानमध्ये मोठी गुंतवणूक; शेकडो प्रकल्पांची कंत्राटं भारतीय कंपन्यांकडे

काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानात तैनात असलेलं अमेरिकन सैन्य माघारी परतताच तालिबाननं आक्रमक कारवाया सुरू केल्या. आता संपूर्ण देशावर तालिबानचा अंमल आहे. त्यामुळे देशातील जनता दहशतीखाली आहे. लाखो लोक देश सोडून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता तालिबाननं भारताबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तालिबान कोणत्याही देशाला अफगाणिस्तानची जमीन दुसऱ्या देशावर कारवाई करण्यासाठी वापरू देणार नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्यांना सांगितलं. पाकिस्तानच्या हम वृत्तवाहिनीला सोमवारी रात्री तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी मुलाखत दिली. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच तालिबाननं आपली विविध मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट केली. 

भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. संपूर्ण देशात भारतीय कंपन्या विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. तालिबानमुळे ही सर्व गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर सुहेल शाहीन यांनी तालिबानची भूमिका मांडली. 'भारत अफगाणिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत आहे. विविध विकास प्रकल्प, मुलभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. भारत हे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करू शकतो. कारण ते लोकांसाठी आहेत,' असं शाहीन म्हणाले.

आमच्या भूमीचा वापर कोणत्याही देशानं इतर राष्ट्रांवर कारवाई करण्यासाठी करू नये. आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या धोरणात ही गोष्ट बसत नाही, असं शाहीन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. भारताची अफगाणिस्तानसोबत चर्चा सुरू आहे. भारतानं तालिबानच्या सत्तेला मान्यता दिलेली नाही. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सरकारनं माघारी बोलावलं आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान