शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

बांगलादेश मैत्रिला जागला, भारताला थेट स्वत:चं बंदर वापरण्याची दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:13 IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी नुकतीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्यावर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. तसंच भारताच्या पूर्वेकडील राज्यांना संपर्क वाढवण्याचा दृष्टीनं चटगांव बंदराचा वापर करता येईल, असंही त्या म्हणाल्या.

“जर संपर्क वाढवला जात असेल तर आसाम आणि त्रिपुरा सारख्या भारतातील पूर्वेकडील राज्यांना चटगांव बंदराचा वापर करता येईल,” असं शेख हसीना यांनी कथितरित्या एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं. ढाका ट्रिब्यूननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एस. जयशंकर यांनी गुरुवारी शेख हसीना यांची भेट घेतली.

चटगांव बंदर हे बांगलादेशमधील मुख्य बंदर आहे. जयशंकर आणि शेख हसीना यांच्या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे शेख हसीना यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं. “दोन्ही देशांना फायद्यासाठी संपर्क वाढवण्याची गरज आहे. बागलादेशच्या दक्षिणपूर्व चटगांव बंदराचा उपयोग केल्यानं भारतच्या पूर्वोत्तर क्षेत्राला विशेष रुपानं फायदा होईल,” अशी बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांचे प्रेस सचिव एहसानुल करीम यांनी दिली. भारत आणि बांगलादेशदरम्यान सीमापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर ते बंद करण्यात आले होते, असा उल्लेखही शेख हसीना यांनी केला. यादरम्यान द्वीपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे करीम म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना त्यांच्या सोयीनुसार भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. बैठकीदरम्यान द्विपक्षीय संबंधांशिवाय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली,” असं जयशंकर यांनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकर