शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१५ ऑगस्टपूर्वी भारताला जागतिक स्तरावर मिळाला सर्वोच्च बहुमान; चीन, पाकिस्तानचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 07:34 IST

पाकिस्तान, तालिबान आणि चीन यांच्या नापाक षडयंत्राला भारत सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून मात देऊ शकतो.

ठळक मुद्दे भारत(India) त्यांच्या कारकिर्दीत निष्पक्ष काम करेल. या कार्यकाळात भारत संबंधित नियम आणि मानकांचे पालन करेल भारत १ जानेवारी २०२१ रोजी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला होता. भारत पुढील एक महिन्याच्या कार्यकाळाचा प्रोग्राम ऑफ वर्क बनवतंय. त्यात चीन आणि पाकिस्तानच्या कृत्यांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली – जगातील सर्वात ताकदवान १५ सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपवण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी विधान केले आहे. भारताच्या या कतृत्वामुळं चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, भारत(India) त्यांच्या कारकिर्दीत निष्पक्ष काम करेल. या कार्यकाळात भारत संबंधित नियम आणि मानकांचे पालन करेल असं प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत अस्थायी सदस्य आहे आणि त्याचा २ वर्षाचा कालावधी आहे. भारताने रविवारी १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतला. भारताचा हा कार्यकाळ पुढील १ महिना चालेल. भारत १ जानेवारी २०२१ रोजी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला होता. या काळात भारताला दोनदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

१ महिना काश्मीर मुद्द्यावर कुठलीही चर्चा पाक करू शकत नाही

पाकिस्तानी(Pakistan) प्रवक्ते म्हणाले की, भारताने अध्यक्षपदाचा कार्यभार घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जम्मू काश्मीर प्रस्ताव लागू करावा अशी आम्ही भारताला पुन्हा एकदा आठवण देऊ इच्छितो. अफगाणिस्तानात पाकिस्तानी समर्थक तालिबानी हिंसाचार घडवत आहेत. अफगाणिस्तान सैन्यासोबत त्यांचे युद्ध सुरू आहे. अशावेळी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळालं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताचं असणं म्हणजे पुढील १ महिना पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावर कुठलीही चर्चा सुरक्षा परिषदेत करू शकत नाही. त्यामुळे भारताला अध्यक्षपद मिळणं हे पाकिस्तानला अडचणीत टाकणारं आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं याला पाकिस्तानचा विरोध आहे. इतकचं नाही तर पुढच्या एक महिन्यात अफगाणिस्तानातून विदेशी सैन्य पुन्हा परत जातंय त्यामुळे अफगाणिस्तानबाबत काही मोठ्या हालचाली होऊ शकतात.

पाकिस्तान, तालिबान आणि चीन(China) यांच्या नापाक षडयंत्राला भारत सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून मात देऊ शकतो. पाकिस्तान नेहमीच भारताच्या अफगाणिस्तानमध्ये उपस्थितीला विरोध करतंय. भारत पुढील एक महिन्याच्या कार्यकाळाचा प्रोग्राम ऑफ वर्क बनवतंय. त्यात चीन आणि पाकिस्तानच्या कृत्यांचाही समावेश आहे. भारत दहशतवादविरोधी अभियान आणि सागरी सुरक्षा यावर चर्चा करणार आहे. त्यात प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान भारताच्या निशाण्यावर असतील हे निश्चित आहे.

टॅग्स :Indiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानchinaचीनTerrorismदहशतवाद