शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 10:03 IST

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपल्या शेजाऱ्यांना फितवण्याचे चीनचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी भारताने नेपाळमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही व्यूहरचना चीनला चोख प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते. 

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे. या चालीवर मात करण्यासाठी भारताने नवे धोरण स्वीकारले आहे. नेपाळमध्ये  एकात्मिक चेक पोस्टच्या (आयसीपी) आधुनिकीकरणासह नवीन चौक्या बांधणे, पूर्वेकडून पश्चिमेकडे व सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे टाकणे, पूल बांधणे, नवीन रेल्वे जाळे इत्यादींसाठी भारताने सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. 

पाच रेल्वेमार्गांवर भारताचे काम सुरूnव्यूहात्मक दृष्टीने महत्त्वाचे पाच रेल्वे मार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे. यात विविध धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचाही समावेश आहे. nनेपाळमध्ये रस्ते बांधणीचे काम खूप आव्हानात्मक आहे. चीन रस्ते प्रकल्पांच्या बहाण्याने नेपाळमधील जनमत प्रभावित करू पाहत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतchinaचीन