एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:25 IST2025-01-22T17:24:50+5:302025-01-22T17:25:27+5:30

गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती.

In one fell swoop, India showed the Maldives the price that statement was costly | एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

गेल्या वर्षी भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला होता. मालदीवच्या एका मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, या टीकेवरुन तणाव निर्माण झाला होता. या टीकेचा फटका मालदीवला बसला होता. या टीकेनंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी मालदीवला मोठा फटका बसला होता. 

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

त्यावेळी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना भारताचे महत्त्व कळले होते, भारतासोबत घेतलेल्या पंगामुळे मालदीवला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. भारतीय पर्यटक मालदीवपासून दूर राहिले होते, ज्याचा परिणाम देखील दिसून येत होता. २०२४ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३७.४७ टक्क्यांनी घट झाली.

अहवालानुसार, गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती. मालदीव हा एक बेट देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था येथे येणाऱ्या पर्यटकांवर चालते. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे मालदीवला अनेक महिने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. गेल्या दीड दशकापासून, भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणाऱ्या टॉप-१० देशांमध्ये आहेत. गेल्या दशकात भारत नेहमीच टॉप-५ देशांमध्ये राहिला आहे.

निवडणूक काळात भारताविरोधात विधान केले

२०२३ मध्ये भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. भारताविरुद्ध घोषणाबाजी करून मोहम्मद मुइझ्झू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी बेट राष्ट्रातून भारतीय सैन्य परत पाठवण्याचा निर्णय घेतला, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या नंतरच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले. यानंतर मुइझ्झू यांनी कारवाई केली आणि मंत्र्यांवर कारवाई केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर एप्रिलमध्ये, भारतीय पर्यटकांची संख्या फक्त ७७८० वर आली, ही मागील महिन्यापेक्षा ५५% कमी होती.

Web Title: In one fell swoop, India showed the Maldives the price that statement was costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.