शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:48 IST

युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तान सुधरलेला नाही. 

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन तीनदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान तोंडावर आदळेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर केले आहे. 

पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला दिलेल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते. 

मुलाखतीमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी धमकीही त्याने दिली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतwarयुद्ध