शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:48 IST

युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तान सुधरलेला नाही. 

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन तीनदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान तोंडावर आदळेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर केले आहे. 

पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला दिलेल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते. 

मुलाखतीमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी धमकीही त्याने दिली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतwarयुद्ध