शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:48 IST

युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तान सुधरलेला नाही. 

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन तीनदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान तोंडावर आदळेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर केले आहे. 

पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला दिलेल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते. 

मुलाखतीमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी धमकीही त्याने दिली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतwarयुद्ध