शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:48 IST

युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तान सुधरलेला नाही. 

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन तीनदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान तोंडावर आदळेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर केले आहे. 

पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला दिलेल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते. 

मुलाखतीमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी धमकीही त्याने दिली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतwarयुद्ध