शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतासोबतच्या राजनैतिक संकटाला इमरान खान जबाबदार, पाकिस्तानातील विरोधी पक्षांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:22 IST

भारतासोबतच्या राजनैतिक संकटासाठी पंतप्रधान इमरान खान जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे.

इस्लामाबाद  - भारतासोबतच्या राजनैतिक संकटासाठी पंतप्रधान इमरान खान जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करताना इमरान खान यांनी घाई दाखविल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे या पक्षांनी म्हटले.परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी इमरान खान यांनी होमवर्क करायला हवे होते, असा टोलाही विरोधकांनी मारला. इमरान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून दहशतवाद आणि काश्मीरसारख्या मुद्यासह संबंध सुरळीत करण्यासारख्या आव्हानात्मक मुद्यांवर पुन्हा द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचा आग्रह केला होता. या महिन्यात न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे विदेश मंत्री महमूद कुरेशी यांच्यात द्विपक्षीय बैठक घेण्याला भारताने यापूर्वी सहमती दर्शविली होती. जम्मू-काश्मिरात तीन पोलिसांची हत्या आणि काश्मिरी अतिरेकी बुरहान वानी याची प्रतिमा उजळ करणारे डाक तिकीट जारी करून पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखवून दिला. एकीकडे संबंध सुरळीत करण्याची भाषा आणि दुसरीकडे दहशतवादाचे समर्थन या दुटप्पी भूमिकेचा निषेध करीत भारताने शुक्रवारी ही बैठक रद्द करण्याची घोषणा केली.  परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर चर्चेला होकार दिल्यानंतर भारताने दहशतवादी घटनांचा निषेध करीत बैठक रद्द करण्याचे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले असल्याचे वृत्त डॉन या दैनिकाने दिले आहे. सरकारची तयारी नव्हती-पीएमएलमाजी विदेशमंत्री आणि पीएमएल-एनचे खासदार ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी इमरान खान यांच्यावर टीका करताना सरकारच पहिल्या दिवासापासूनच चर्चेसाठी तयार नव्हते असे प्रतीत होते. पाकिस्तान चर्चेसाठी यापूर्वीही तयार होता. आम्ही दोन देशांचे संबंध सामान्य करण्याच्या विरोधात नाही, मात्र पाकिस्तानने आपली प्रतिष्ठा कायम राखायला हवी, असे स्पष्ट केले. पीपीपीचे उपाध्यक्ष शेरी रहमान म्हणाले की, इमरान खान यांच्या सरकारने चर्चेसाठी भारताला अनुकूल करण्यापूर्वी पूर्ण होमवर्क करायला हवे होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारत