शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:27 IST

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून तेल, डाळ, पीठांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे सरकार आयएमएफकडे कर्जासाठी प्रयत्न करत आहे. पण, अजुनही आयएमएफ ने कर्ज दिलेले नाही, यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिघडली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडूनही पाकिस्तानन सरकारने भारताविरोधात बोलण्याचे थांबवलेले नाही. यापार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमधील माध्यमांनी सरकारला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय.

पाकिस्तानमध्ये आता सत्ताधाऱ्यांच्या जुन्या भूमिकेतून यू-टर्न घेत भारतासोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्याची वेळ आली आहे, असा सूर आळवला जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उठलेली ही मागणी भारताचे उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांच्या विधानानंतर समोर आली आहे, यात लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी शुक्रवारी सुचवले की, अनेक दशके जुना पाकिस्तान-भारत वाद मिटला पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी सखोल आर्थिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले पाहिजेत.

कुमार म्हणाले, "भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत कारण आपण आपला भूगोल बदलू शकत नाही." कुमार यांनी दोन्ही देशांना व्यापार संबंध सामान्य करण्याचे आवाहन केले. यावर पाकिसितानमधील वृत्तपत्रात संपाककीय मध्येही ही मागणी केली आहे. ' लाहोर चेंबरने आपल्या समारंभासाठी भारतीय अधिकाऱ्याला आमंत्रित करणे आणि नवी दिल्लीच्या प्रतिनिधीने संबंध सुधारण्यासाठी बोलणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वृत्तपत्राने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, गेल्या काही वर्षांत विषारी वक्तृत्वाच्या युगाला निरोप देण्याची वेळ आली आहे. २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील घटनांनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आणि व्यापारी संबंधही संपुष्टात आले, असंही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?

'या क्षणी हा पर्याय अशक्य वाटू शकतो, पण सध्याचे द्विपक्षीय संबंध लक्षात घेता, व्यापार संबंध पूर्ववत झाल्यास, पाकिस्तानच्या आर्थिक संकटांचे वाईट दिवस दूर होऊ शकतात. दोन्ही देशांमधील चांगले व्यापारी संबंध उपखंडात अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, असेही वृत्तपत्राने लिहिले आहे. भारत आणि आपल्या शेजारील इतर राज्यांशी व्यापार, खरेतर, व्यापक आशियाई प्रदेशात भौगोलिक-आर्थिक समज पुनर्संचयित करतो, जो पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे, असंही यात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या प्रमुख पाश्चात्य व्यापारी भागीदारांच्या – अमेरिका आणि युरोपीय संघाच्या – अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत, असा दावाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक व्यापारी भागीदारांसोबत सध्याचे सुस्त असलेले संबंध सुधारणे आवश्यक आहे, असंही यात म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत