शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:27 IST

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून तेल, डाळ, पीठांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे सरकार आयएमएफकडे कर्जासाठी प्रयत्न करत आहे. पण, अजुनही आयएमएफ ने कर्ज दिलेले नाही, यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिघडली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडूनही पाकिस्तानन सरकारने भारताविरोधात बोलण्याचे थांबवलेले नाही. यापार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमधील माध्यमांनी सरकारला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय.

पाकिस्तानमध्ये आता सत्ताधाऱ्यांच्या जुन्या भूमिकेतून यू-टर्न घेत भारतासोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्याची वेळ आली आहे, असा सूर आळवला जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उठलेली ही मागणी भारताचे उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांच्या विधानानंतर समोर आली आहे, यात लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी शुक्रवारी सुचवले की, अनेक दशके जुना पाकिस्तान-भारत वाद मिटला पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी सखोल आर्थिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले पाहिजेत.

कुमार म्हणाले, "भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत कारण आपण आपला भूगोल बदलू शकत नाही." कुमार यांनी दोन्ही देशांना व्यापार संबंध सामान्य करण्याचे आवाहन केले. यावर पाकिसितानमधील वृत्तपत्रात संपाककीय मध्येही ही मागणी केली आहे. ' लाहोर चेंबरने आपल्या समारंभासाठी भारतीय अधिकाऱ्याला आमंत्रित करणे आणि नवी दिल्लीच्या प्रतिनिधीने संबंध सुधारण्यासाठी बोलणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वृत्तपत्राने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, गेल्या काही वर्षांत विषारी वक्तृत्वाच्या युगाला निरोप देण्याची वेळ आली आहे. २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील घटनांनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आणि व्यापारी संबंधही संपुष्टात आले, असंही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?

'या क्षणी हा पर्याय अशक्य वाटू शकतो, पण सध्याचे द्विपक्षीय संबंध लक्षात घेता, व्यापार संबंध पूर्ववत झाल्यास, पाकिस्तानच्या आर्थिक संकटांचे वाईट दिवस दूर होऊ शकतात. दोन्ही देशांमधील चांगले व्यापारी संबंध उपखंडात अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, असेही वृत्तपत्राने लिहिले आहे. भारत आणि आपल्या शेजारील इतर राज्यांशी व्यापार, खरेतर, व्यापक आशियाई प्रदेशात भौगोलिक-आर्थिक समज पुनर्संचयित करतो, जो पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे, असंही यात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या प्रमुख पाश्चात्य व्यापारी भागीदारांच्या – अमेरिका आणि युरोपीय संघाच्या – अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत, असा दावाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक व्यापारी भागीदारांसोबत सध्याचे सुस्त असलेले संबंध सुधारणे आवश्यक आहे, असंही यात म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत