शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:45 IST

पाकिस्तानसाठी मदत कार्यक्रमाचा पुढील भाग जाहीर करण्यापूर्वी आयएमएफने पाकवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतासोबतच्या संघर्षानंतर पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयएमएफने पाकिस्तानला त्यांच्या मदत कार्यक्रमाचा पुढील भाग जारी करण्यापूर्वी ११ नवीन अटी लादल्या आहेत. यासोबतच, आयएमएफने पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, भारतासोबतच्या तणावामुळे योजनेच्या आर्थिक, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका वाढू शकतो. आयएमएफने पाकिस्तानवर लादलेल्या नवीन अटींमध्ये संसदेने १७,६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला मान्यता देणे, वीज बिलांवरील कर्ज परतफेडीच्या अधिभारात वाढ करणे आणि तीन वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठवणे यांचा समावेश आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएफने शनिवारी जारी केलेल्या कर्मचारी-स्तरीय अहवालात असेही म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे कार्यक्रमाच्या वित्तीय, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो. आयएमएफने आता पाकिस्तानवर आणखी ११ नव्या अटी लादल्या आहेत. अशाप्रकारे, पाकिस्तानवर आतापर्यंत ५० अटी लादण्यात आल्या आहेत.

काय आहेत नव्या ११ अटी?

> पुढील आर्थिक वर्षासाठी १७,६०० अब्ज रुपयांचा नवीन अर्थसंकल्प संसदेतून मंजूर करणे बंधनकारक असेल.> वीज बिलांवरील अधिभारात वाढ> ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त कर्ज परतफेड शुल्क आकारले जाईल.> वापरलेल्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठवणे.> चार संघीय युनिट्सद्वारे नवीन कृषी उत्पन्न कर कायद्याची अंमलबजावणी, ज्यामध्ये करदात्याची ओळख, परतावा प्रक्रिया, अनुपालन सुधारणा आणिसंवाद मोहिमा समाविष्ट आहेत.> जून २०२५ पर्यंत ही अंतिम मुदत पूर्ण करायची आहे.> आयएमएफ शिफारशींवर आधारित ऑपरेशनल सुधारणांसाठी कृती आराखडा प्रकाशित करणे.> २०२७ नंतरच्या आर्थिक क्षेत्राची रणनीती तयार करणे आणि नंतर ती सार्वजनिक करणे.> ऊर्जा क्षेत्राशी संबंधित चार अतिरिक्त अटी आहेत, ज्यात शुल्क निश्चिती, वितरण सुधारणा आणि आर्थिक पारदर्शकता यांचा समावेश आहे. > देशातील संपर्क मोहीम अधिक मजबूत करावी लागेल.

आयएमएफच्या नवीन ११ अटींसह, आता पाकिस्तानवर एकूण ५० अटी लादल्या गेल्या आहेत. पाकिस्तानला आता केवळ या अटी पूर्ण कराव्या लागणार नाहीत तर प्रादेशिक तणाव शांत करण्याचे आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर