शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:57 IST

बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच बलूचिस्तानातही पाकिस्तानविरोधात आग पेटली आहे. याठिकाणी बलूच आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा जवानांना टार्गेट केले जात आहे. बलूचिस्तान स्वतंत्र करावे या मागणीसाठी इथल्या बंडखोर गटाने पाकविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात पाकिस्तानी सैन्य अनेक पातळीवर मागे पडताना दिसत आहे. बंडखोरांनी अनेक सरकारी संस्थांना आग लावली आहे. भारतासोबतच्या तणावात अडकलेल्या पाकिस्तानला हा दुहेरी मार सहन करावा लागत आहे.

बलूचिस्तान पाकसाठी का महत्त्वाचे?

बलूचिस्तान हे पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जर बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाला तर त्याला किती मोठे नुकसान होईल याचा अंदाज पाकिस्तानला आहे. पाकिस्तानात सोने, तांबे भांडार संपुष्टात येईल. बलूचिस्तान प्रांतात ५.९ बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे यांच्या खाणी आहेत. जे पाकिस्तानला आर्थिक जोखि‍मेत टाकू शकते. 

किती मोठी आहे बलूचिस्तानची इकॉनॉमी?

बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. बलूचिस्तानात सोने, तांबे, नैसर्गिक गॅससारखी अनेक खनिजे आहेत जे पाकिस्तानसाठी आर्थिक फायद्याचे आहे. परंतु जर हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला तर देशात गंभीर आर्थिक, ऊर्जा आणि सुरक्षा संकटाचा सामना करावा लागू शकतो. बलूचिस्तानचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या एकूण ४४ टक्के आहे. इथली लोकसंख्या १४.९ मिलियन आहे. देशाचं ऊर्जा संकट दूर करण्यासाठी इथल्या नैसर्गिक गॅसची भूमिका महत्त्वाची आहे. या भागात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. त्याशिवाय तांबेही अधिक प्रमाणात सापडते. 

बलूचिस्तान सांभाळणे पाकसाठी मोठं आव्हान

बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाल्यास सुरक्षा आणि राजनैतिक आव्हान निर्माण करणारे असेल. इराण, अफगाणिस्तानच्या जवळ असल्याने हा भाग पाकिस्तानसाठी एक गड म्हणून काम करतो. त्याशिवाय चीन-पाकिस्तानी भागीदारीमुळे चीनही या भागात सक्रीय आहे. जर बलूचिस्तान वेगळा झाला तर पाकिस्तानची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानातील ७० टक्के उत्पादन बलूचिस्तानात होते. पाकिस्तानातील ९०% चेरी, द्राक्षे आणि बदाम, ६०% जर्दाळू, पीच आणि डाळिंब, ७०% खजूर आणि ३४% सफरचंद येथे उत्पादित केले जातात. एकट्या मकरान भागात दरवर्षी सुमारे ४,२५,००० टन खजूर उत्पादन होते. त्यामुळे या भागाची इकॉनॉमी पाकच्या अर्थव्यवस्थेला किती फटका लावू शकते याचा अंदाज घेता येईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर