शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:57 IST

बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच बलूचिस्तानातही पाकिस्तानविरोधात आग पेटली आहे. याठिकाणी बलूच आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा जवानांना टार्गेट केले जात आहे. बलूचिस्तान स्वतंत्र करावे या मागणीसाठी इथल्या बंडखोर गटाने पाकविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात पाकिस्तानी सैन्य अनेक पातळीवर मागे पडताना दिसत आहे. बंडखोरांनी अनेक सरकारी संस्थांना आग लावली आहे. भारतासोबतच्या तणावात अडकलेल्या पाकिस्तानला हा दुहेरी मार सहन करावा लागत आहे.

बलूचिस्तान पाकसाठी का महत्त्वाचे?

बलूचिस्तान हे पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जर बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाला तर त्याला किती मोठे नुकसान होईल याचा अंदाज पाकिस्तानला आहे. पाकिस्तानात सोने, तांबे भांडार संपुष्टात येईल. बलूचिस्तान प्रांतात ५.९ बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे यांच्या खाणी आहेत. जे पाकिस्तानला आर्थिक जोखि‍मेत टाकू शकते. 

किती मोठी आहे बलूचिस्तानची इकॉनॉमी?

बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. बलूचिस्तानात सोने, तांबे, नैसर्गिक गॅससारखी अनेक खनिजे आहेत जे पाकिस्तानसाठी आर्थिक फायद्याचे आहे. परंतु जर हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला तर देशात गंभीर आर्थिक, ऊर्जा आणि सुरक्षा संकटाचा सामना करावा लागू शकतो. बलूचिस्तानचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या एकूण ४४ टक्के आहे. इथली लोकसंख्या १४.९ मिलियन आहे. देशाचं ऊर्जा संकट दूर करण्यासाठी इथल्या नैसर्गिक गॅसची भूमिका महत्त्वाची आहे. या भागात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. त्याशिवाय तांबेही अधिक प्रमाणात सापडते. 

बलूचिस्तान सांभाळणे पाकसाठी मोठं आव्हान

बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाल्यास सुरक्षा आणि राजनैतिक आव्हान निर्माण करणारे असेल. इराण, अफगाणिस्तानच्या जवळ असल्याने हा भाग पाकिस्तानसाठी एक गड म्हणून काम करतो. त्याशिवाय चीन-पाकिस्तानी भागीदारीमुळे चीनही या भागात सक्रीय आहे. जर बलूचिस्तान वेगळा झाला तर पाकिस्तानची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानातील ७० टक्के उत्पादन बलूचिस्तानात होते. पाकिस्तानातील ९०% चेरी, द्राक्षे आणि बदाम, ६०% जर्दाळू, पीच आणि डाळिंब, ७०% खजूर आणि ३४% सफरचंद येथे उत्पादित केले जातात. एकट्या मकरान भागात दरवर्षी सुमारे ४,२५,००० टन खजूर उत्पादन होते. त्यामुळे या भागाची इकॉनॉमी पाकच्या अर्थव्यवस्थेला किती फटका लावू शकते याचा अंदाज घेता येईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर