शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 2:37 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल । आमसभेत व्हिडिओ निवेदन

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संरचनेपासून (डिसिजन-मेकिंग स्ट्रक्चर) भारताला किती दिवस दूर ठेवणार आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या आमसभेतील आमचर्चेत सहभागी होण्यासाठी जारी केलेल्या व्हिडिओ निवेदनात मोदी यांनी हे वक्तव्य केले.

संयुक्त राष्ट्र सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिशाली ‘सुरक्षा परिषदे’त कायम सदस्यत्व मिळावे, यासाठी भारत दीर्घ काळापासून प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. १५ सदस्यीय अस्थायी परिषदेवर दोन वर्षांसाठी झालेल्या भारताच्या निवडीचा कालावधी येत्या १ जोनवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वक्तव्यास महत्त्व प्राप्त होते. मोदी यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वाधिक मोठा लोकशाही देश आहे. १.३ अब्ज लोक भारतात राहतात. भारतात होणाऱ्या संक्रमणात्मक बदलांचे परिणाम जगाच्या मोठ्या भूभागावर होत असतात. अशा देशाला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाºया संस्थेपासून किती दिवस दूर ठेवले जाणार आहे? १.३ अब्ज भारतीयांच्या मनात संयुक्त राष्ट्रांबद्दल अद्वितीय आदर आणि विश्वास आहे. भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुधारणांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे, हेही तेवढेच सत्य आहे. सुधारणा प्रक्रिया खरोखरच आपल्या तार्किक निष्पत्तीपर्यंत पोहोचणार आहे का, याबाबत भारतीयांना आता चिंता वाटत आहे.पाक पंतप्रधानांच्या टीकेला सडेतोड उत्तरच्पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतावर काश्मीरच्या मुद्यावरून केलेल्या गंभीर आरोपांना भारताने सडतोड उत्तर दिले आहे.च्भारताकडून काश्मिरात सरकार पुरस्कृत दहशतवाद पसरविला जात असून, जम्मू-काश्मीरच्या जनतेवर अत्याचार करणाºया भारतीय जवानांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करावी, असे इम्रान खान यांनी आपल्या व्हिडिओ निवेदनात शुक्रवारी म्हटले होते.च्संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रथम सचिव मिजितो विनितो यांनी इम्रान खान यांचे भाषण सभागृहात दाखविले जात असताना सभात्याग केला होता. त्यानंतर ‘प्रत्युत्तराचा अधिकार’ वापरून विनितो यांनी भारताची जोरदार बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.च्तेथे भारताने लागू केलेले सर्व नियम आणि कायदे भारताचा अंतर्गत मामला आहे. वाद केवळ बेकायदेशीररीत्या पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरबाबत आहे. पाकने हा भूभाग रिकामा करावा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ