शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हिंदूंच्या मंदिरांची स्थिती बिकट; पाकिस्तानच्या आयोगाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 14:46 IST

Pakistan Hindu temple : सडल आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सोपवला अहवाल, मंदिरांच्या बिकट परिस्थितीवर व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देपाकिस्तानच्या आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सोपवला अहवालहिंदूंची संख्या कमी असल्याचं ट्रस्टचं उत्तर

पाकिस्तानमध्येहिंदू अल्पसंख्यांक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची होत असलेली बिकट परिस्थिती मांडणारा एक अहवाल समोर आला आहे. पाकिस्तानचे डॉ. शोएब सडल आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला आपला सातवा अहवाल सोपवला आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या प्रमुख स्थळांची अवस्था बिकट असल्याचं नमूद करण्य़ात आलं आहे. पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉननं दिलेल्या वृत्तानुसार सडल आयोगानं ५ फेब्रुवारी रोजी हिंदू समुदायाच्या धार्मिक स्थळांबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सोपवला. 'अवाक्युसी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (इटीपीबी) अल्पसंख्यांक समुदायाच्या प्राचीन स्थळांचं आणि धार्मिक स्थळांची देखरेख करण्यात अयशस्वी ठरले आहे,' असा ठपका या अहवालातून ठेवण्यात आला आहे. तसंच अहवालात यासंदर्भात नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. आयोगानं ६ जानेवारी रोजी चकवाल येथील कटस राज मंदिर आणि ७ जानेवारी रोजी मुल्तान येथील प्रह्लाद मंदिराचा दौरा केला होता. या मंदिरांच्या झालेल्या दुर्देशेचे फोटोही या अहवालासोबत जोडण्यात आलं आहेत.सर्वोच्च न्यायालयाकडून समिती पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं या आयोगाची स्थापना केली होती. सध्या एक सदस्यीय असलेल्या या आयोगासोबत तीन सदस्यही जोडण्यात आले. याणधअये डॉ. रमेश वंकवानी, साकिब जिलानी आणि पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरल यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान, अवाक्युसी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाला तेरी मंदिर/समाधीचं पुनर्बांधणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि खैबर पख्तूनख्वांच्या प्रांतीय सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्यासाठी वेळोवेळी मदत करण्याचे आदेश देण्यात यावेत अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.काय म्हटलंय अहवालात?अहवालात तेरी मंदिर, कटस राद मंदिर, प्रह्लाद मंदिर आणि हिंगलाज मंदिराच्या डागडुजीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवाक्युसी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाच्या कायद्यात सुधारणा होणं आवश्यक असून हिंदू आणि शीख समुदायाच्या धार्मिक स्थळांची देखभाल आणि पुनर्बांधणीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्याच्या सूचनाही यात करण्यात आल्या आहेत. अवाक्युसी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील ३६५ मंदिरांपैकी केवळ १३ मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तर ६५ मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हिंदू समुदायाकडेच सोपवण्यात आली आहे. तर अन्य मंदिरांबाबत माहितीही उपलब्ध नाही. तसंच या टेक्नॉलॉजीच्या युगात इटीपीबीकडे आपल्या संपत्तींचं जिओ टॅगिंग करण्य़ाची क्षमता नसल्याबद्दल या अहवालात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. "इटीपीबीनं मंदिरं आणि गुरुद्वारे न चालण्यामागे हिंदू आणि शीख समुदायाची संख्या कमी झाल्याचं कारण सांगितलं आहे. यावरूनही अहवालात नाराजी व्यक्त करण्यात आली. जवळपास हिंदूंची संख्या कमी असली तरी काही ठिकाणी मंदिरं खुली आहेत. जसं बलुचिस्तानमध्ये हिंगलाज माता मंदिर आणि करक जिल्ह्यात श्रीपरमहंस जी महाराज मंदिर," असंही आयोगानं अहवालात नमूद केलं आहे. तसंच ट्रस्टला केवळ अल्पसंख्यांकांनी सोडलेल्या मौल्यवान संपत्तींच्या अधिग्रहणातच स्वारस्य असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाला सोपवलेल्या अहवालात आयोगानं केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूTempleमंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय