शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:27 IST

Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काबुल - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील अश्रफ घनी सरकारला पळवून लावत देशातील सत्तासुत्रे आपल्या ताब्यात घेतली आहे. अफगाणिस्तानमध्येतालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. (Afghanistan-Taliban Crisis) विदेशी नागरिकांबरोबरच अनेक अफगाणी नागरिकही देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही एक व्यक्ती अशी आहे, जिने आपले कर्तव्य सोडून पळून न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan)

ही व्यक्ती आहे, अफगाणिस्तानमधील रतननाथ मंदिरातील पुजारी पंडित राजेश कुमार. त्यांनी मंदिर सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यादरम्यान, तालिबानच्या हातून आपला मृत्यू झाल्यास ती मी माझी सेवा समजेन, असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवर तालिबानचा कब्जा झाल्यानंतर अफगाणिस्तान सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीबरोबर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीपासूनच लोकांनी देश सोडण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, इतर लोकांप्रमाणेच राजेश कुमार यांनाही काबुल सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक हिंदूंनी त्यांचा प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. याबाबत माहिती देताना भारद्वाज यांनी सांगितले की, काबुलमध्ये रतननाथ मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी सांगितले की, काही दिंदूंनी मला काबुल सोडण्याचे आवाहन केले होते. तसेच माझ्या राहण्याच्या आणि प्रवासाची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र माझ्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून या मंदिरात सेवा केली आहे. मी हे मंदिर सोडून जाणार नाही. जर तालिबानने मला मारले तरी ती मी माझी सेवा समजेन.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत अफगाणिस्तानमधील लहान शीख आणि हिंदू समुदायाला भारतात येण्यासाठी मदत केली जाईल. आम्ही अफगाण, शीख आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात आहोत. आम्ही त्यांना भारतात परतण्यासाठी मदत करू. तत्पूर्वी अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरिकांना चार अॅडव्हायजरी जारी करण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानHinduहिंदू