शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:15 IST

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे.

नवी दिल्ली - भारत आणि इराण या दोन्ही देशांत घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. अमेरिकेनं इराणवर काही निर्बंध लागले असून देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, इराण काहीसा अलिप्त पडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा इराणने सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्ण संबंधासह पर्यटन विकासालाही चालना देण्याचं इराणकडून होत आहे. त्यासाठी, देशाने काही ठोस पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय नागरिकांना इराणमध्ये जाण्यासाठी आता व्हिसा आवश्यक असणार नाही.

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. या यादीत रशिया, सौदी अरब, कतार, जपान आणि युएईसह एकूण ३२ देशांची नावे आहेत. इराणमधील अधिकृत न्यूज एजन्सी IRNA च्या वृत्तानुसार, आता भारतीयांनाही इराणभ्रमंतीसाठी व्हिजाची अट शिथील करण्यात आली आहे. इराणमधील पर्यटन वाढीस लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. इराणसह श्रीलंका आणि मलेशिया देशांनीही भारतीय नागरिकांना त्यांच्या देशातील प्रवेशासाठी व्हीसा बंधनकारक असणार नाही. हे दोन्ही देशही भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारताचा इराणसोबत यापूर्वीच करारानुसार व्हीसामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, भारतीय राजकीय नेत्यांना इराणमध्ये राहण्यासाठी व्हिसामध्ये सवलत दिली जाते. मात्र, पहिल्यांदाच एका इस्लामिक देशाने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना व्हीसा सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारतीय नागरिकांना पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 

काय म्हणाले विदेशमंत्री

इराणचे पर्यटनमंत्री एजातुल्ला जर्गहामी यांनी बुधवारी वृत्तसंस्था आईआरएनएशी बोलताना म्हटले की, अधिकााधिक पर्यटनाच्या उद्देशाने इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, पश्चिमी भागात इराणच्याविरुद्ध दिसणाऱ्या इराणोफोबियांविरुद्ध लढा देणं हा आहे, असे जर्गहामी यांनी म्हटलं. 

दरम्यान, इराण आणि भारत देशात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. येथील चाबहार बंदर प्रोजेक्टमध्येही भारताची प्रमुख भागिदारी राहिली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण अफ्रीकेतील जोहान्सबर्गमध्ये आयोजित BRICS शिखर सम्मेलनादरम्यान इराणही या परिषदेत सहभागी झाला आहे. भारत हा ब्रिक्सचा महत्त्वाचा सदस्य आहे. तर, इराण १ जानेवारी २०२४ पासून अधिकृतपणे ब्रिक्सचा सदस्य असणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतIranइराणVisaव्हिसाtourismपर्यटन