शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:15 IST

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे.

नवी दिल्ली - भारत आणि इराण या दोन्ही देशांत घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. अमेरिकेनं इराणवर काही निर्बंध लागले असून देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, इराण काहीसा अलिप्त पडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा इराणने सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्ण संबंधासह पर्यटन विकासालाही चालना देण्याचं इराणकडून होत आहे. त्यासाठी, देशाने काही ठोस पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय नागरिकांना इराणमध्ये जाण्यासाठी आता व्हिसा आवश्यक असणार नाही.

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. या यादीत रशिया, सौदी अरब, कतार, जपान आणि युएईसह एकूण ३२ देशांची नावे आहेत. इराणमधील अधिकृत न्यूज एजन्सी IRNA च्या वृत्तानुसार, आता भारतीयांनाही इराणभ्रमंतीसाठी व्हिजाची अट शिथील करण्यात आली आहे. इराणमधील पर्यटन वाढीस लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. इराणसह श्रीलंका आणि मलेशिया देशांनीही भारतीय नागरिकांना त्यांच्या देशातील प्रवेशासाठी व्हीसा बंधनकारक असणार नाही. हे दोन्ही देशही भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारताचा इराणसोबत यापूर्वीच करारानुसार व्हीसामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, भारतीय राजकीय नेत्यांना इराणमध्ये राहण्यासाठी व्हिसामध्ये सवलत दिली जाते. मात्र, पहिल्यांदाच एका इस्लामिक देशाने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना व्हीसा सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारतीय नागरिकांना पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 

काय म्हणाले विदेशमंत्री

इराणचे पर्यटनमंत्री एजातुल्ला जर्गहामी यांनी बुधवारी वृत्तसंस्था आईआरएनएशी बोलताना म्हटले की, अधिकााधिक पर्यटनाच्या उद्देशाने इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, पश्चिमी भागात इराणच्याविरुद्ध दिसणाऱ्या इराणोफोबियांविरुद्ध लढा देणं हा आहे, असे जर्गहामी यांनी म्हटलं. 

दरम्यान, इराण आणि भारत देशात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. येथील चाबहार बंदर प्रोजेक्टमध्येही भारताची प्रमुख भागिदारी राहिली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण अफ्रीकेतील जोहान्सबर्गमध्ये आयोजित BRICS शिखर सम्मेलनादरम्यान इराणही या परिषदेत सहभागी झाला आहे. भारत हा ब्रिक्सचा महत्त्वाचा सदस्य आहे. तर, इराण १ जानेवारी २०२४ पासून अधिकृतपणे ब्रिक्सचा सदस्य असणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतIranइराणVisaव्हिसाtourismपर्यटन