शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:35 IST

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, वॉशिंग्टन: जगभरातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहत असलेले तब्बल २५ देश गंभीर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या एक्वाडस्ट वॉटर रिस्क ॲटलसमध्ये हे चित्र समोर आले आहे. टंचाईचा सामना करीत असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २४ व्या स्थानी आहे. जगभरातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच सुमारे ४०० कोटी लोकांना दरवर्षी किमान महिनाभरासाठी टंचाईला सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर विचार केला तर १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे.

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

  • ज्या देशांमध्ये नागरिक उपलब्ध पाण्याचा जवळपास पूर्णपणे वापर करतात तिथे पाण्याची अत्यंतिक चणचण आहे असे म्हटले जाते. या स्थितीत कमी दुष्काळ आला तरी गंभीर स्थिती उद्भवू शकते.
  • मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत स्थिती गंभीर आहे. या भागात ८३ टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण जाणवते आहे. दक्षिण आशियामध्ये ७४ टक्के लोकसंख्येला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

भारताच्या जीडीपीवर परिणाम 

जगभरातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला २०५० पर्यंत वर्षभरातून एका महिनाभरासाठी पाण्याच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. २०५० मध्ये भारत, मेक्सिको, इजिप्त आणि तुर्कस्तान या चार देशांच्या निम्म्याहून अधिक जीडीपीचे नुकसान केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे होणार आहे.

खाद्यसुरक्षेवरही संकट

पाण्याच्या टंचाईमुळे देशातील औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसतो. वीजनिर्मितीही घटते. शेती उत्पादनांवर गंभीर परिणाम होतो. पाणीटंचाईमुळे जगासमोर खाद्यसुरक्षेचे संकट उभे राहिले आहे. जगभरातील ऊस, गहू, तांदूळ आणि मका उत्पादक पाणीटंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जावर पोहोचण्याचा अंदाज आहे. इतक्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य पिकवावे लागणार आहे. यासाठी २०१० तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन जवळपास ५६ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी