शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:02 IST

लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी, सोमवारच्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संयंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लेखक यांनी, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका मंत्र्यांनी सांगितले. जनरेशन-झेडच्या निदर्शकांनी सोमवारी केलेल्या निदर्शन हिंसक बनले असून आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले लेखक? -लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

काठमांडूची परिस्थिती नियंत्रणाबाहेर -नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये या निदर्शनाचा सर्वाधिक परिणाम झाला. स्थानिक प्रशासनाने चार महत्त्वाच्या भागात कर्फ्यू लागू केला आहे. यात शितल निवास (राष्ट्रपती कार्यालय), महाराजगंज परिसर, ग्रीन हाऊस (उपराष्ट्रपती कार्यालय), लैनचौर परिसर, रायणहिटी दरबार संग्रहालय परिसर आणि सिंह दरबार परिसर यांचा समावेश आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला फिरण्याचा, सभा घेण्याचा,ने मिरवणूक काढण्याचा अथवा निषेध करण्याचा अधिकार नाही. रात्री १० वाजेपर्यंत या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काठमांडूमध्ये लागू केलेल्या या कर्फ्यूचा उद्देश परिस्थिती नियंत्रित करणे आणि सुरक्षा राखणे असल्याचे सांगितले जात आहे....म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनHome Ministryगृह मंत्रालयSocial Mediaसोशल मीडिया