शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:02 IST

लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी, सोमवारच्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संयंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लेखक यांनी, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका मंत्र्यांनी सांगितले. जनरेशन-झेडच्या निदर्शकांनी सोमवारी केलेल्या निदर्शन हिंसक बनले असून आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले लेखक? -लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

काठमांडूची परिस्थिती नियंत्रणाबाहेर -नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये या निदर्शनाचा सर्वाधिक परिणाम झाला. स्थानिक प्रशासनाने चार महत्त्वाच्या भागात कर्फ्यू लागू केला आहे. यात शितल निवास (राष्ट्रपती कार्यालय), महाराजगंज परिसर, ग्रीन हाऊस (उपराष्ट्रपती कार्यालय), लैनचौर परिसर, रायणहिटी दरबार संग्रहालय परिसर आणि सिंह दरबार परिसर यांचा समावेश आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला फिरण्याचा, सभा घेण्याचा,ने मिरवणूक काढण्याचा अथवा निषेध करण्याचा अधिकार नाही. रात्री १० वाजेपर्यंत या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काठमांडूमध्ये लागू केलेल्या या कर्फ्यूचा उद्देश परिस्थिती नियंत्रित करणे आणि सुरक्षा राखणे असल्याचे सांगितले जात आहे....म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनHome Ministryगृह मंत्रालयSocial Mediaसोशल मीडिया