शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:19 IST

लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आणखी जास्त अधिकार मिळाले आहेत,यामुळे आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकांचे टेन्शन वाढले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. सीमेवर गोळीबारही झाले. दरम्यान, आता दोन्ही देशात 'युद्धविराम'ची घोषणा झाली. दोन्ही देशातील परिस्थितीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान लक्ष ठेवून आहेत. खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांची बहिणी तुरुंगात गेल्या होत्या. त्यांनी भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. 

इम्रान खान यांनी भारत पुन्हा हल्ला करु शकतो अशी भीती व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या बहिणीने दिली. युद्धविराम स्वीकारली असली तरी हल्ला होऊ शकतो. इम्रान खानची बहीण अलिमा खान म्हणाल्या, भारत अजूनही हल्ला करू शकतो याची इम्रान खान यांना काळजी आहे. त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि सरकारला सतर्क राहण्यास सांगितले आहे. तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्या बहिणींना ८ आठवड्यांनंतर भेटण्याची परवानगी दिली होती.

"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!

मिळालेल्या माहितीनुसार, अलिमा यांनी इम्रान खान यांना भेटल्यानंतर माध्यमांना सांगितले की, 'त्यांनी सांगितले की भारताकडून अजूनही हल्ला होऊ शकतो. इम्रान खान मला म्हणाले नरेंद्र मोदी पाकिस्तानचा द्वेष करतात आणि रागाच्या भरात पुन्हा हल्ला करू शकतात. ६०% युद्ध मानसिक असते. मला भीती आहे की नरेंद्र मोदी पुन्हा हल्ला करू शकतात. अलिमा म्हणाल्या की, इम्रान खान यांना देशाची चिंता आहे.

इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात

माजी पंतप्रधान इम्रान खान ९ मे २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि त्यांच्या समर्थकांनी लष्करी कार्यालयांवरही हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांविरुद्ध लष्करी न्यायालयात खटले सुरू आहेत. इम्रान खान यांनी समर्थकांनी या बाबींविरुद्ध रस्त्यावर उतरून निषेध करावा असं सांगितलं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर