शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

“मोदी पुन्हा PM झाल्यास संविधान बदलाचा अधिकार, भारत हिंदूराष्ट्र बनेल”: माजी पाक सचिवांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:07 IST

Pakistan Reaction On India Lok Sabha Election 2024 Result: भारत हिंदूराष्ट्र बनण्याची तयारी सुरू करेल. पाकिस्ताननेही आधीच तयारी करायला हवी, असे पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे.

Pakistan Reaction On India Lok Sabha Election 2024 Result:जगातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अगदी काही वेळात सुरू होणार आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या महानिकालावर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. विशेष करून पाकिस्तान भारतीय निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून आहे. पाकिस्तानातील अधिकारी, मंत्री भारताच्या लोकसभा निवडणुकीबाबत सातत्याने प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. यातच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास संविधान बदलाचा अधिकार मिळेल. तसेच भारत हिंदू राष्ट्र बनेल, असा दावा पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे. 

नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले आणि NDAला संसदेत दोन तृतीयांश जागा मिळाल्या, तर भाजपाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार मिळेल. भाजपाला हे बळ मिळताच ते भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यास सुरुवात करेल. भाजपा निवडणूक प्रचारात जे काही आश्वासने देते, ते सत्तेत आल्यानंतर पूर्ण करते. आजवर आपण पाहिले आहे. मोदी निवडणूक प्रचारात जे काही बोलले, ते त्यांनी आपला प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अनुच्छेद ३७० चा उल्लेख केला होता. सत्तेत आल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी केली होती. मला वाटते की यावेळी त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आहे. त्यासाठी त्यांनी खूप काम सुरू केले आहे, असे मत एजाज अहमद चौधरी यांनी व्यक्त केले.

भारत हिंदूराष्ट्र होण्यासाठी पाकिस्तानात कोणाचाही आक्षेप नाही. तिथे हिंदू बहुसंख्य असतील तर हिंदू राष्ट्र निर्माण करा. त्याने आम्हाला काय फरक पडतो? पण ते आधीच मुस्लिम आणि इतर धर्माच्या लोकांना त्रास देत आहेत. हिंदू राष्ट्रानंतर आणखी संकटे निर्माण करतील, असा दावा चौधरी यांनी केला. तसेच भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यास पाकिस्तानबाबतचा त्यांचा दृष्टिकोन तसाच राहील, त्यामुळे पाकिस्तानने आधीच तयारी करायला हवी. पाकिस्तानात घुसून मारण्याचा भारताची हिंमत वाढेल. पाकिस्तानसाठी ही चिंतेची बाब आहे. इतर देशांसाठीही ही चिंतेची बाब आहे, असे मला वाटते. पाकिस्तानने आतापासूनच तयारी सुरू करावी, असेही चौधरी म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pakistanपाकिस्तान