शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Afghanistan Crisis: 'नव्या भारताला तालिबानी चांगलंच ओळखून, हल्ला केला तर...'; माजी परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:54 IST

Afghanistan Crisis: भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे.

Afghanistan Crisis: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासमोर देखील नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. यातच भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे. 'तालिबानला आता चांगलंच ठावूक आहे की २००१ सालचा भारत आता राहिलेला नाही. सध्या २०२१ साल आहे आणि आता हिंदुस्तानात जे जरकार आहे ते बालाकोट सारखी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. जर त्यांनी देशात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं प्रत्युत्तर मिळेल', असं नटवर सिंह म्हणाले.

अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी 

नटवर सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला इशारा दिला आहे. "तालिबानसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सध्या ते अफगाणिस्तानमध्ये काय करणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेऊन मोठी चूक केली आहे. पंजशीरसारख्या भागात युद्ध सुरू झालं तर मोठी लढाई निर्माण होऊ शकते. याच पद्धतीनं जर अत्याचार सुरू राहिले तर जगात कुणीच तालिबानला मान्यता देणार नाही. त्यामुळे पुढील आठवडा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. जर त्यांनी सरकार स्थापन केलं तर परिस्थिती वेगळी असेल आणि तर ते असमर्थ ठरले तेव्हाही वेगळी परिस्थिती निर्माण होईल. यात पाकिस्तानचाही छुपा हस्तक्षेप आहे आणि तो पुढेही राहणार आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

चीन आणि पाकिस्तानची खेळी''तालिबान सध्या तेच बोलत आहेत की जे जगाला ऐकायचं आहे. जगाला तालिबानच्या म्हणण्यावर विश्वास नसला तरी तालिबाननं आपली प्रतिमा चांगली दाखवण्याचा इरादा यावेळी केला आहे. त्यामुळे तालिबानला नेमकं कोण मार्गदर्शन करतं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना हे सगळं कोण शिकवतंय? यामागे चीन आणि पाकिस्तानचा तर हात नाही ना? कारण तालिबान्यांनी केलेली विधानं लक्षात घेता त्यामागे काहीतरी मोठं प्लानिंग करण्यात आलेलं आहे. चीन आणि पाकिस्तानची ही खतरनाक खेळी आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

"तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच चीननं तालिबानसोबत मैत्रीची घोषणा केली आहे. तर तालिबाननं अफगाणिस्तानला गुलामीतून बाहेर काढल्याचं विधान पाकिस्ताननं केलं आहे. अफगाणिस्तानात या दोन देशांचे दूतावास देखील तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नुसते सुरू नव्हे, तर सुरळीत कामकाज देखील करत आहेत", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान