शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

Afghanistan Crisis: 'नव्या भारताला तालिबानी चांगलंच ओळखून, हल्ला केला तर...'; माजी परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:54 IST

Afghanistan Crisis: भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे.

Afghanistan Crisis: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासमोर देखील नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. यातच भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे. 'तालिबानला आता चांगलंच ठावूक आहे की २००१ सालचा भारत आता राहिलेला नाही. सध्या २०२१ साल आहे आणि आता हिंदुस्तानात जे जरकार आहे ते बालाकोट सारखी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. जर त्यांनी देशात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं प्रत्युत्तर मिळेल', असं नटवर सिंह म्हणाले.

अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी 

नटवर सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला इशारा दिला आहे. "तालिबानसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सध्या ते अफगाणिस्तानमध्ये काय करणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेऊन मोठी चूक केली आहे. पंजशीरसारख्या भागात युद्ध सुरू झालं तर मोठी लढाई निर्माण होऊ शकते. याच पद्धतीनं जर अत्याचार सुरू राहिले तर जगात कुणीच तालिबानला मान्यता देणार नाही. त्यामुळे पुढील आठवडा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. जर त्यांनी सरकार स्थापन केलं तर परिस्थिती वेगळी असेल आणि तर ते असमर्थ ठरले तेव्हाही वेगळी परिस्थिती निर्माण होईल. यात पाकिस्तानचाही छुपा हस्तक्षेप आहे आणि तो पुढेही राहणार आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

चीन आणि पाकिस्तानची खेळी''तालिबान सध्या तेच बोलत आहेत की जे जगाला ऐकायचं आहे. जगाला तालिबानच्या म्हणण्यावर विश्वास नसला तरी तालिबाननं आपली प्रतिमा चांगली दाखवण्याचा इरादा यावेळी केला आहे. त्यामुळे तालिबानला नेमकं कोण मार्गदर्शन करतं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना हे सगळं कोण शिकवतंय? यामागे चीन आणि पाकिस्तानचा तर हात नाही ना? कारण तालिबान्यांनी केलेली विधानं लक्षात घेता त्यामागे काहीतरी मोठं प्लानिंग करण्यात आलेलं आहे. चीन आणि पाकिस्तानची ही खतरनाक खेळी आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

"तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच चीननं तालिबानसोबत मैत्रीची घोषणा केली आहे. तर तालिबाननं अफगाणिस्तानला गुलामीतून बाहेर काढल्याचं विधान पाकिस्ताननं केलं आहे. अफगाणिस्तानात या दोन देशांचे दूतावास देखील तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नुसते सुरू नव्हे, तर सुरळीत कामकाज देखील करत आहेत", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान