शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Afghanistan Crisis: 'नव्या भारताला तालिबानी चांगलंच ओळखून, हल्ला केला तर...'; माजी परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:54 IST

Afghanistan Crisis: भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे.

Afghanistan Crisis: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासमोर देखील नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. यातच भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे. 'तालिबानला आता चांगलंच ठावूक आहे की २००१ सालचा भारत आता राहिलेला नाही. सध्या २०२१ साल आहे आणि आता हिंदुस्तानात जे जरकार आहे ते बालाकोट सारखी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. जर त्यांनी देशात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं प्रत्युत्तर मिळेल', असं नटवर सिंह म्हणाले.

अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी 

नटवर सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला इशारा दिला आहे. "तालिबानसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सध्या ते अफगाणिस्तानमध्ये काय करणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेऊन मोठी चूक केली आहे. पंजशीरसारख्या भागात युद्ध सुरू झालं तर मोठी लढाई निर्माण होऊ शकते. याच पद्धतीनं जर अत्याचार सुरू राहिले तर जगात कुणीच तालिबानला मान्यता देणार नाही. त्यामुळे पुढील आठवडा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. जर त्यांनी सरकार स्थापन केलं तर परिस्थिती वेगळी असेल आणि तर ते असमर्थ ठरले तेव्हाही वेगळी परिस्थिती निर्माण होईल. यात पाकिस्तानचाही छुपा हस्तक्षेप आहे आणि तो पुढेही राहणार आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

चीन आणि पाकिस्तानची खेळी''तालिबान सध्या तेच बोलत आहेत की जे जगाला ऐकायचं आहे. जगाला तालिबानच्या म्हणण्यावर विश्वास नसला तरी तालिबाननं आपली प्रतिमा चांगली दाखवण्याचा इरादा यावेळी केला आहे. त्यामुळे तालिबानला नेमकं कोण मार्गदर्शन करतं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना हे सगळं कोण शिकवतंय? यामागे चीन आणि पाकिस्तानचा तर हात नाही ना? कारण तालिबान्यांनी केलेली विधानं लक्षात घेता त्यामागे काहीतरी मोठं प्लानिंग करण्यात आलेलं आहे. चीन आणि पाकिस्तानची ही खतरनाक खेळी आहे", असं नटवर सिंह म्हणाले. 

"तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच चीननं तालिबानसोबत मैत्रीची घोषणा केली आहे. तर तालिबाननं अफगाणिस्तानला गुलामीतून बाहेर काढल्याचं विधान पाकिस्ताननं केलं आहे. अफगाणिस्तानात या दोन देशांचे दूतावास देखील तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नुसते सुरू नव्हे, तर सुरळीत कामकाज देखील करत आहेत", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान