शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2017 2:17 PM

भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता अटारी सीमेवरील तिरंग्यापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च महिन्यात भारताकडून भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. भारताने ध्वज उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली होती. इतकंच नाही तर भारत हेरगिरी करत असल्याचा आरोप करत कांगावा करण्यासही सुरुवात केली होती.

आणखी वाचा - 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

राज्यातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ध्वजस्तंभ उभा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार आहे तेथील झाडे कापली जात आहेत. जर का सर्व काही नियोजनप्रमाणे पार पडलं तर हा जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल. 

 

याचवर्षी 5 मे रोजी भारताने 360 फूटावर तिरंगा उभारतला, मात्र जोरात वाहणा-या वा-यामुळे काही दिवसातच तो फाटला होता, ज्यामुळे तो बदलावा लागला होता. तिरंग्याची काळजी घेताना अधिका-यांना अनेक समस्या जाणवत आहेत. आतापर्यंत पाचवेळा तिरंगा बदलावा लागला आहे. ध्वजस्तंभालाही अद्याप तिरंग्याचा रंग देण्यात आलेला नाही. भारत - पाकिस्तान सीमारेषेवर बीटिंग रीट्रीट कार्यक्रमादरम्यान तिरंगा खाली पडल्याने भारतीय अधिका-यांची अडचण झाली होती.

 

वाघा बॉर्डरवर ध्वज उभारण्याच्या निर्णयामागे मानसिकतेशिवाय दुसरं कारण असू शकत नाही. भारताने अटारी सीमेवर उभा केलेला ध्वज लाहोरमधूनही दिसत असल्याने पाकिस्तानी अधिका-यांना जनतेमधील आपली प्रतिष्ठा कमी झाल्याचं वाटत असावं. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं बीएसएफचे माजी अधिकारी डी एश सारन बोलले आहेत. यामागे कोणतंही दुसरं कारण असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.

 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

मार्च महिन्यात भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली. हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले होते.